
फोटो सौजन्य - Social Media
काय आहे अंकिताची सोशल मीडिया पोस्ट?
अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुण्यात घडणाऱ्या या वाढत्या मुद्द्यांना टार्गेट केले आहे, तसे निषेध व्यक्त केला आहे. पण तिचा सवाल आहे की “फक्त निषेध व्यक्त करून चालणार आहे का? कायदा या अशा नराधमांवर Action कधी घेणार?” ती म्हणते की, “आधी नसरापूर घटना झाली मग पुण्यातून ‘आजोबा आणि नात’ असं आणखीन एक प्रकरण समोर आलं. आपण काय केलं? रस्त्यावर उतरलो. निषेध व्यक्त केला. शांत झालो. दुसऱ्या दिवशी आणखीन तिसरं प्रकरण समोर येणार.” एकंदरीत, कायदा अशा नराधमांना का पोसतोय? जर संपूर्ण जग त्या 65 वर्षीय नराधमाच्या विरोधात आहे. कुणी त्याच्या पाठिंब्यात नाही, तर कायदा कसली वाट पाहतोय? असा सवाल अंकिताने केला आहे.
अंकिता म्हणते की, “या अशा गोष्टी सतत घडत आहेत, यासाठी आम्हाला कायदा हवाय. त्या गोष्टी प्रूफ करण्यासाठी, ता घटनेनंतर पुढे काय होईल? या सगळ्या गोष्टींसाठी या संबंधित कायदा असणे आवश्यक आहे.”
या पोस्टखाली कॅप्शनमध्ये अंकिताने नमूद केले आहे की, “ती फक्त तीन वर्षांची होती… तिला जग काय असतं हेही कळलं नव्हतं. खेळणं, हसणं, आईच्या कुशीत झोपणं. एवढंच तिचं छोटंसं जग होतं. पण आज त्या जगावर कोणाच्यातरी विकृत मानसिकतेने कायमचा काळा डाग लावला.लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती नसावी. कारण अशा गुन्ह्यांमुळे फक्त एक जीव नाही, तर संपूर्ण समाजाची मानवता मरते. आता तरी आवाज उठवूया. कारण आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या कोणाचं तरी बालपण पुन्हा ओरडत राहील.”