
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut हिने गाजवलेल्या ‘Lock Upp’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माती Ekta Kapoor यांचा हा लोकप्रिय शो नव्या पर्वासह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पत्रकार परिषदेत ‘Lock Upp 2’ मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी Farah Khan आणि Riteish Deshmukh यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नामुळे रितेश देशमुख संतापल्याचा पाहायला मिळाला. एका पत्रकाराने त्याला Salman Khan आणि Sanjay Dutt यांच्या वादग्रस्त प्रकरणांचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “या दोघांपैकी कोणाला तुम्ही ‘Lock Upp’मध्ये आणाल आणि त्यांना कोणती शिक्षा द्याल?” असा प्रश्न विचारण्यात आला.
हा प्रश्न ऐकताच रितेश देशमुखने नाराजी व्यक्त केली. त्याने स्पष्ट शब्दांत उत्तर देताना म्हटलं, “मी तुम्हाला उत्तर देणार नाही. हा तुमचा प्रश्न आहे आणि मला त्याचं उत्तर देण्याची गरज नाही. मी त्या दोघांपैकी कोणालाही ‘Lock Upp’मध्ये आणणार नाही. हा माझा शो नाही, मी फक्त सूत्रसंचालक आहे. निर्माते कलाकारांना शोमध्ये आणण्यासाठी कसे संपर्क साधतात याची मला काहीच माहिती नाही.”
रितेशच्या या उत्तरानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली. मात्र, त्याने परिस्थिती संयमाने हाताळत कोणताही वाद टाळला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी रितेशच्या संयमी आणि परिपक्व भूमिकेचं कौतुक केलं आहे.
विशेष म्हणजे, रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. यापूर्वी सलमान खानने रितेशच्या एका चित्रपटात विशेष भूमिका साकारत त्याच्या मैत्रीला मान दिला होता. त्यामुळे या प्रश्नावर रितेशने घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.