नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले
मृतांची ओळख प्रेमा देवी (वय ४१), मनीष (वय १७) आणि कल्पना (वय १९) अशी झाली आहे. प्रेमा देवी या राजेंद्र राम यांच्या पत्नी होत्या, तर मनीष आणि कल्पना ही त्यांची मुले होती. या दुर्घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा
परिसरात झालेल्या पावसानंतर डोंगराचा भाग खचल्याचे सांगण्यात आले आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती आणि मलबा खाली आला. हा मलबा वेगाने निवासी घरात शिरल्याने घरातील तिघांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते ढिगाऱ्याखाली दबले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली.
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. बचाव पथकांनी मलबा हटवून घरात अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. मोठ्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. बचाव पथकांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
अल्मोड्याचे जिल्हाधिकारी अंशुल सिंह यांनी या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. उडयूडा येथे पावसानंतर एका घरात मलबा घुसल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर एसडीआरएफ आणि आपत्ती निवारण पथक तातडीने पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बचाव मोहिमेदरम्यान तिघांचे मृतदेह सापडल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून प्रभावित कुटुंबाला नियमानुसार आर्थिक आणि इतर मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे डोंगराळ भागात निर्माण होणाऱ्या भूस्खलनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उडयूडा येथील या दुर्घटनेत ४१ वर्षीय आई आणि तिच्या १७ व १९ वर्षीय दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.






