
पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची मोठी माहिती (Photo Credit- X)
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनर देश आहे. भारत दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो. देशात सध्या एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप कार्यरत असून, त्यापैकी बहुतांश सरकारी कंपन्यांचे आहेत. मंत्रालयाने खात्री दिली आहे की, कोणत्याही पंपावर तेल संपणे अशी परिस्थिती उद्भवलेली नाही आणि भविष्यातही इंधनाची कमतरता भासणार नाही.
#WATCH | Delhi | Sujata Sharma, Joint Secretary (Marketing & Oil Refinery), Ministry of Petroleum & Natural Gas, says, “…As far as the crude is concerned, the situation is quite comfortable. I also told you yesterday that we use almost 55 lakh barrels of oil every day. We are… pic.twitter.com/Jhxe1V8U0O — ANI (@ANI) March 12, 2026
Opposition Protests LPG Shortage : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड
केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर घरगुती गॅसच्या (LPG) उपलब्धतेसाठीही सरकारने विशेष पावले उचलली आहेत. ९ मार्च रोजी ‘अत्यावश्यक वस्तू कायद्या’अंतर्गत आदेश जारी करून सर्व रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर देशांतर्गत एलपीजी उत्पादन २५ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सुजाता शर्मा यांनी नमूद केले की, भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो. यातील ९० टक्के पुरवठा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मार्गे होतो. सध्याची जागतिक स्थिती आव्हानात्मक असली तरी, देशांतर्गत ग्राहकांना गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
देशात दररोज सुमारे ५० लाख एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत जागतिक तणावाच्या भीतीने ग्राहकांकडून सिलिंडर बुकिंगमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. यावर बोलताना मंत्रालयाने स्पष्ट केले की, पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त सिलिंडर बुक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
इंधन आणि गॅसचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गरजू ग्राहकांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची डिलिव्हरी प्राधान्य क्रमाने सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. एकूणच, जागतिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी भारतातील ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सरकारने ठामपणे सांगितले आहे.
LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा! ४० देशांकडून पुरवठा सुरू; बुकिंगनंतर अडीच दिवसांत मिळणार सिलेंडर