भारत-पाकिस्तान युद्धाचा भडका उडणार (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत देखील महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारत पाकिस्तानवर निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ तारखेला सायरन वाजवण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्यावेळेस हवाई हल्ला होतो त्यावलेस सायरन वाजवला जातो. सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल आणि सायरन वाजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहालगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे केंद्र सरकारचे हे निर्देश अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत.
राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.
Big Breaking: राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे.