
भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! (Photo Credit- X)
आफ्रिकेतील रस्त्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत इबोला विषाणूचे अत्यंत भयानक रूप पाहायला मिळत आहे. सध्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) आणि युगांडा या आफ्रिकी देशांमध्ये या जीवघेण्या आजाराचे शेकडो संशयित रुग्ण समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (Africa CDC) संपूर्ण आफ्रिका खंडाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
WHO Declares #Ebola Outbreak a Public Health Emergency of International Concern; Africa CDC Declares Public Health Emergency of Continental Security Government of India Advises Citizens to Avoid Non-Essential Travel to Democratic Republic of the Congo, Uganda and South Sudan… — PIB India (@PIB_India) May 24, 2026
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, २०२६ मध्ये पसरत असलेल्या ‘बुंडिबुग्यो स्ट्रेन’ (Bundibugyo Strain) या इबोलाच्या नवीन प्रकारावर अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा निश्चित औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे हा विषाणू अधिक घातक मानला जात आहे. या नवीन उद्रेकात आतापर्यंत ७०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून २१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या संसर्गामध्ये मृत्यूदर (Mortality Rate) ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. इबोला संसर्गामुळे मानवी शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. गंभीर प्रकरणांमध्ये शरीरांतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.
Cockroach Janta Party वर सरकारचा आणखी एक ॲक्शन? एक्सनंतर वेबसाईटही बंद
इबोलाचा वाढता धोका लक्षात घेऊन भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांसाठी तात्काळ ट्रॅव्हल ॲडव्हायझरी (प्रवास नियमावली) जारी केली आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भारतीय नागरिकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांचा बिगर-गरजेचा (Non-essential) प्रवास टाळण्याचा कडक सल्ला देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत या देशांचा प्रवास पुढे ढकलणे हाच सुरक्षित पर्याय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता, इबोला विषाणूचा शोध पहिल्यांदा १९७६ मध्ये लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत या जीवघेण्या विषाणूमुळे जगभरात १५,००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी काही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय