
२१ राज्यांमध्ये ९ तासांत मुसळधार पावसाचा इशारा,
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. त्यातच हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 21 राज्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये, जोरदार वादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडू शकतात. या धोकादायक पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, उत्तर हरियाणा आणि आसपासच्या भागांवर वरच्या हवेतील चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याशिवाय, मध्य राजस्थानवरही वरच्या हवेतील चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
कोणत्या राज्यांना दिला इशारा?
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांत पावसाचा अंदाज आहे.
अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार
अरुणाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान झाले. दिबांग व्हॅली जिल्ह्यात आलेल्या अचानक पुरात (फ्लॅश फ्लड) लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले. या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, लोअर सुबनसिरी जिल्ह्यात रस्त्याच्या कटिंगच्या ठिकाणी झालेल्या भीषण भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला.
शोधमोहीम युद्धपातळीवर
बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी ५व्या ग्रेनेडियर्सच्या पचकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच आयटीबीपीच्या ५८व्या बटालियनचे जवान, सीमा रस्ते संघटनेची (बीआरओ) ६२ आरसीसी, अरुणाचल प्रदेश पोलिस आणि स्थानिक स्वयसेवकाच्या संयुक्त पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
Washim News : ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर