India Rain Alert: महाराष्ट्रासह 'या' राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट...
देशभरात मुसळधार पावसाचा इशारा
अनेक राज्यांमध्ये नागरिक उकाड्याने त्रस्त
हवामान विभागाने दिला जोरदार पावसाचा इशारा
India Weather Update: देशभरातील अनेक राज्यांमध्ये आज हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, त्या राज्यांमध्ये नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने आज कोणता इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. या ठिकाणचे तापमान 35 ते 37 डिग्री इतके आहे. येत्या काही दिवसांत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही
पश्चिम भारतात काय आहे स्थिती?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. पश्चिम गुजरातमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा प्रदेशात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडीसहा या राज्यांमध्ये देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने बृहन्मुंबई प्रदेश, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तासांत काही पश्चिम उपनगरांमध्ये ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला.