Photo Credit- Social Media (दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी करत आतिशी मार्लेना यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश)
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे, पण आतापासूनच आम आदमी पार्टी सक्रीय झाली आहे. अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यापासून आम आदमी पार्टी वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांनी आतापासूनच विजयाची पटकथा लिहिण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते. यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी आणि इतर मंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) ओखला औद्योगिक क्षेत्रातील पीडब्ल्यूडी रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान आतिशी यांनी खराब झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आदेश दिले.
मंत्री आणि आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री आतिशी या स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनदेखील दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी केली होती. आज पहाटेपासून मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्ली सरकारच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी केली. मुख्यमंत्री आतिशी यांनी दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिल्लीतील रस्त्यांची पाहणी केली असता येथील रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून आले. पाहणीदरम्यान मुख्यमंत्री अतिशी यांना असे आढळून आले की, अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा विद्युत तारा टाकण्यासाठी रस्ते कापण्यात आले होते, परंतु त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा: विधानसभेआधी मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्य सरकारने घेतला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय
दिल्लीतील रस्त्यांची अवस्था पाहून सीएम आतिशी यांनी या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, ‘दिल्लीतील सर्व पीडब्ल्यूडी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, दिल्ली सरकारचे संपूर्ण कॅबिनेट आज सकाळपासून ग्राउंड झिरोवर रस्त्यांची पाहणी करत आहे. या क्रमाने मी NISIC ओखला, मोदी मिल फ्लायओव्हर, चिराग दिल्ली, तुघलकाबाद एक्स्टेंशन, मथुरा रोड, आश्रम चौक आणि अंडरपास या रस्त्यांची पाहणी केली. या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना येथे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाहणीदरम्यान लोकांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीपर्यंत सर्व दिल्लीकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.
हेही वाचा: विधानसभेच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय