
india new defense strategy drone warfare nuclear submarines maritime security 2026
India’s new defense strategy 2026 : जगाच्या एका कोपऱ्यात सुरू असलेले युद्ध दुसऱ्या देशाच्या संरक्षण भिंती कशा मजबूत करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्याचे भारत. पश्चिम आशियातील (Middle East War Impact) रक्तरंजित संघर्षाने जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीची नाजूकता उघड केली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या आर्थिक आणि संरक्षण धोरणावर झाला आहे. भारताचा ९० टक्के व्यापार आणि ८० टक्के कच्चे तेल ज्या सागरी मार्गांवरून येते, तिथे निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे भारतीय संरक्षण नियोजकांनी (Defense Planners) आता आपली रणनीती ‘हाय-टेक’ आणि ‘सागरी केंद्रित’ केली आहे.
भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी, बाब-अल-मंदेब आणि मलाक्काची सामुद्रधुनी हे मार्ग केवळ पाण्याचे रस्ते नसून देशाची आर्थिक जीवनवाहिनी आहेत. मलाक्का सामुद्रधुनीतून जगातील ४० टक्के व्यापार होतो, ज्यावर नजर ठेवण्यासाठी भारत आता अंदमान-निकोबार बेटांवरील आपली ‘त्रिसैन्य कमांड’ (Tri-Service Command) अधिक मजबूत करत आहे. इतकेच नाही तर, मॉरिशसमधील अगलेगा बेट आणि ओमानमधील दुक्म बंदर येथे भारताने आपली उपस्थिती वाढवली आहे. यामुळे पश्चिम हिंद महासागरात कोणत्याही संकटाच्या वेळी भारतीय नौदल अवघ्या काही तासांत तैनात होऊ शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine: ‘आता रशियाला धडा शिकवण्याची वेळ’ इराण युद्धविरामाची घोषणा होताच युक्रेनची ट्रम्पकडे ‘ही’ विशेष मागणी
पश्चिम आशियातील युद्धाने हे सिद्ध केले आहे की, आता युद्धे केवळ तोफांनी नाही तर ड्रोनने जिंकली जातात. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये ड्रोनच्या सामर्थ्याची प्रचिती दिली आहे. आता भारत इस्रायली ‘हेरॉन’ ड्रोनसोबतच स्वदेशी बनावटीचे ‘रुस्तम-२’ (TAPAS BH-201) आणि ‘नेत्रा’ यांसारखे ड्रोन वेगाने विकसित करत आहे. भारताचा ‘घातक’ स्टेल्थ लढाऊ ड्रोन प्रकल्प यशस्वी झाल्यास, शत्रूच्या हद्दीत न जाताही अचूक हल्ले करणे भारताला शक्य होणार आहे. भविष्यात विमानवाहू जहाजांऐवजी ‘ड्रोन प्रक्षेपित करणारी जहाजे’ ही भारताची प्रमुख शक्ती ठरणार आहेत.
Dominance. Precision. The Future is Indigenous. 🇮🇳 UGRAM “Ferocious” signals a new era in India’s combat capability — a 7.62×51 mm indigenous assault rifle built for decisive superiority. Developed by Dvipa Defence India Pvt. Ltd. and validated by ARDE, DRDO, it embodies… pic.twitter.com/qZJxp0WAOS — Defence Production India (@DefProdnIndia) April 8, 2026
credit – social media and Twitter
भारतीय नौदलाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे अणुशक्तीवर चालणाऱ्या लढाऊ पाणबुड्या. ‘प्रोजेक्ट ७७’ अंतर्गत भारत २०३० पर्यंत सहा स्वदेशी अणु-पाणबुड्यांची बांधणी करणार आहे. या पाणबुड्या आयएनएस अरिहंतपेक्षा वेगळ्या असतील. त्यांचे मुख्य काम शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि भारतीय नौदलाच्या ताफ्याचे संरक्षण करणे हे असेल. हिंद महासागरात चीन आणि इतर शत्रू राष्ट्रांच्या वाढत्या वावराला लगाम घालण्यासाठी या ‘सायलंट किलर’ पाणबुड्या मैलाचा दगड ठरतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House Protest: इराण युद्धाला 15 दिवसांचा ‘विश्राम’! ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा
भारताने केवळ शस्त्रेच नाही तर तंत्रज्ञानाचे जाळेही विणले आहे. सेशेल्स, श्रीलंका, मालदीव आणि मॉरिशस येथे बसवण्यात आलेले ‘कोस्टल रडार नेटवर्क’ आता गुरुग्राममधील ‘इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर’ (IFC-IOR) शी जोडले गेले आहे. या केंद्रातून हिंद महासागरातील प्रत्येक जहाजाची आणि पाण्याखालील पाणबुडीची रिअल-टाइम माहिती भारतीय नौदलाला मिळते. यामुळे अरबी समुद्र असो वा बंगालचा उपसागर, भारताची नजर चुकवणे शत्रूला अशक्य झाले आहे.
Ans: भारताने आता ड्रोन युद्ध, अणु-पाणबुड्या आणि सागरी व्यापारी मार्गांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
Ans: 'प्रोजेक्ट ७७' अंतर्गत भारत २०३० पर्यंत सहा स्वदेशी अणुशक्तीवर चालणाऱ्या लढाऊ पाणबुड्या विकसित करण्याची योजना आखत आहे.
Ans: भारताचा ९०% सागरी व्यापार आणि कच्च्या तेलाचा पुरवठा याच मार्गांवरून होतो, त्यामुळे या मार्गांची सुरक्षा भारताच्या आर्थिक सुरक्षेसाठी अनिवार्य आहे.