असं काय झालं की पाकिस्तानने चार दिवसातचं गुडघे टेकले; अशी आहे इनसाईड स्टोरी
India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानने शनिवारी (१० मे) लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आणि परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. तथापि, ४ दिवसांनी युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.
गेल्या ४ दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तानचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा नष्ट झाली. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केले.
भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला. दरम्यान, शनिवारी दुपारी ३:३५ वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओकडून भारताच्या डीजीएमओंना फोन आला. दोघांमध्ये असा करार झाला की हल्ला होऊ नये. तथापि, दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी पुन्हा चर्चा करतील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यांच्या १०० दहशतवाद्यांना ठार केले.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. तथापि, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल.
भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.
पोट आणि मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ घरगुती आयुर्वेदिक पावडरचे सेवन,
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कबूल केले की भारताने लढाऊ विमानांद्वारे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून या तीन हवाई तळांवर हल्ला केला होता. त्यांनी ते आक्रमक कारवाई म्हणून वर्णन केले, परंतु नुकसानाची पातळी सार्वजनिक केली नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी, हँगर्स आणि ड्रोन ऑपरेशन युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे.