
हिमाचलमधील निसर्गाचा प्रकोप
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात यावर्षीच्या मान्सून आणि इतर नैसर्गिक आपत्तींनी हिमाचल प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. कांग्रामध्ये 111 लोकांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. 11 पुलांना याचा फटका बसला आहे.
सिरमौरला सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. लाहौल-स्पितीमध्ये सोळा, सोलनमध्ये चार, मंडीमध्ये दोन, तर कांग्रा आणि कुल्लूमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. या आपत्तीमुळे ७४३ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सोलनमधील २३९, कांग्रामधील १५५ आणि मंडीमधील १३६ घरांचा समावेश आहे. राज्यात ३६७४ रस्ते, ११ पूल आणि ३०९० पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावित झाल्या आहेत. कांग्रामध्ये ७३६, मंडीमध्ये ६१५ आणि शिमलामध्ये ६१४ रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
चंबामधील ५४८, शिमलामधील ५१४ आणि कांग्रामधील ४९९ पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांचे नुकसान झाले. वीज प्रणालीमध्ये, ४९४.४९ किलोमीटर लांबीच्या उच्च-दाब वाहिन्या, ७५५.०७ किलोमीटर लांबीच्या कमी-दाब वाहिन्या, १७७० खांब आणि ३३८ ट्रान्सफॉर्मर्सचे नुकसान झाले.
कुल्लू आणि लाहौल-स्पितीमध्ये ढगफुटी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे ५३६.८३ कोटी रुपयांचे, जलशक्ती विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांचे ११६.१४ कोटी रुपयांचे आणि खाजगी मालमत्तेचे १२.८७ कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले. जुलै महिन्यात कांग्रामध्ये ५४६.२ मिमी, सिरमौरमध्ये ४८७.५ मिमी आणि चंबामध्ये ४४७.५ मिमी पावसाची नोंद झाली. कुल्लू आणि लाहौल-स्पितीमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.
१८७१ कुटुंबांना मदत निधी
१ ऑगस्टपर्यंत, १८७१ बाधित कुटुंबांना मदत निधी मिळाला आहे, तर १२६० कुटुंबांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. सरकारच्या मते, मदत व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर अर्ज सादर न केल्यामुळे किंवा अर्ज अपूर्ण असल्यामुळे हे प्रामुख्याने घडले आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यावर निधी वितरित केला जाईल.