
'कोणतीही ताकद तुमचा आवाज दाबू शकत नाही'; सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मुख्य तत्त्वे आहेत. अहिंसक उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवणे चुकीचे आहे. ते म्हणाले की, पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर मुद्दे आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता इन्स्टाग्रामवर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत एक पोस्ट केली आहे.
ते म्हणाले, “मोदी सरकारची मूळ तत्त्वे म्हणजे खोटेपणा आणि हिंसाचार. सोनम वांगचुक अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणे चुकीचे आहे. पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर मुद्दे आहेत.” तसेच राहुल गांधी यांनी म्हटलं की, “भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व विश्वास ठेवणाऱ्या आम्हा सर्वांना हे मुद्दे मांडण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.”
१८ जुलैच्या सकाळी, अनिश्चित काळासाठी उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांची उपोषणाच्या २१ व्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका निवेदनात पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे आणि निर्जलीकरणामुळे त्यांची प्रकृती लक्षणीयरीत्या खालावली होती. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर, रुग्णालयाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्सही उभारण्यात आले होते.
Sonam Wangchuk यांना जबरदस्ती उचललं? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; पोलिसांच्या कारवाईवर तातडीच्या…