Rahul Gandhi
काँग्रेस खासदार राहुल गांधी शनिवारी पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण उपस्थित होते. राहुल गांधी यांनी या तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना आणि अनुभवांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी आपण येथे राजकारणावर बोलण्यासाठी आलेलो नाही, असे स्पष्ट केले. त्याऐवजी तरुणाई, महिला, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी संवाद साधला.
कार्यक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः अनेक विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आपले अनुभव आणि प्रश्न मांडले. एका विद्यार्थिनीने आपली समस्या चिठ्ठीद्वारे राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली. राहुल गांधी यांनी ती चिठ्ठी स्वीकारून आपल्या खिशात ठेवली.
बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडताना राहुल गांधी यांनी महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे म्हटले. महिलांनी शिक्षण, व्यवसाय, राजकारण, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, तरीही महिलांना ठरावीक चौकटीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महिलांनी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास स्वतंत्र असले पाहिजे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मनुस्मृतीचा संदर्भ देत महिलांना स्वतंत्र राहू न देण्याची मानसिकता असल्याची टीका त्यांनी केली. कार्यक्रमाची ‘पिंजरा तोडा’ ही संकल्पना असल्याचेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
शिक्षणाच्या क्षेत्रातही मुलींना भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. समाजातील विविध स्तरांवर महिलांना आणि मुलींना येणाऱ्या अडचणींवर संवाद साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
यावेळी भारतातील तरुणांची मोठी लोकसंख्या ही देशाची ताकद असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तरुणांना योग्य संधी, शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळाल्यास देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी महिला सुरक्षा आणि वैयक्तिक अनुभवांशी संबंधित प्रश्न राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. त्यामुळे ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात तरुणाईच्या प्रश्नांसोबतच महिला सक्षमीकरणाचा मुद्दाही केंद्रस्थानी राहिला.






