
राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, 'न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल'
पॅलेट गनच्या वापरामुळे जखमी झालेल्या विद्यार्थी साहिल लोचबच्या समर्थनार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तब्बल आठ तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात FIR दाखल करण्याची मागणी करत राहुल गांधी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. अखेर त्यांच्या आंदोलनानंतर साहिल लोचबची FIR दाखल करण्यात आली.
FIR दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या कारवाईचे स्वागत करत हे न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे म्हटले. साहिलच्या शरीरात अद्याप अनेक छर्रे असल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या डोळ्यात तीन छर्रे असून हृदयाजवळही काही छर्रे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, ते सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर सुमारे आठ तासांनी FIR दाखल झाली. देशाच्या राजधानीतील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एका नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी इतका वेळ लागणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
राहुल गांधींच्या आंदोलनाला यश! पेलेट गन प्रकरणात FIR दाखल करण्यास दिल्ली पोलिसांची तयारी
या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून FIR दाखल करण्यास अडथळा आणला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. स्थानिक पोलिसांना FIR दाखल करायची इच्छा होती, मात्र वरिष्ठ स्तरावरून निर्णयाला विलंब होत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पातळीवर अंतिम मंजुरीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, FIR दाखल झाल्यानंतर साहिल लोचबनेही माध्यमांशी संवाद साधला. गेल्या महिनाभरापासून राहुल गांधी आपल्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी यांनी फोन केला असता FIR दाखल होत नसल्याची माहिती आपण त्यांना दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी भेटून FIR दाखल करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे साहिलने सांगितले.
साहिलच्या म्हणण्यानुसार, 20 जुलै रोजी संसदेच्या दिशेने काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान पॅलेट गनच्या वापरात तो जखमी झाला. 14 ऑगस्टपासून FIR दाखल करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, मात्र त्याला यश आले नव्हते, असेही त्याने सांगितले.
FIR दाखल झाल्याने आता या प्रकरणाच्या तपासाचा मार्ग मोकळा झाला असून, पॅलेट गनच्या वापराबाबत जबाबदारी निश्चित होते का आणि दोषींवर पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
धक्का असा की Jharkhand सरकारला पचणारच नाही! JPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची थेट…