
Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
Marathi Breaking Live Updates : पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे. ही परिस्थिती फार काळ टिकणार नसल्याचा अंदाज आहे. कारण बंगालच्या उपसागरात सतत अनेक प्रणाली विकसित होत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील वाऱ्यांमुळे वेगाने पुढे येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमध्ये बदल दिसून येईल.
पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
25 Sep 2025 05:57 PM (IST)
गणपती उत्सवात झेंडूला शंभर रुपये किलो दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते, परंतु नवरात्राच्या तोंडावरच झेंडूच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते, पावसामुळे झेंडूच्या फुलांची गुणवत्ता खालावली आहे. व्यापारी चांगल्या प्रतीचे झेंडू फक्त ४० ते ५० रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. सणासुदीच्या हंगामात अपेक्षित असलेला फायदा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खर्च भागवणे कठीण झाले आहे.
25 Sep 2025 05:23 PM (IST)
जिथे अनेक मंडळाच्या देवींचे दर्शन घेताना आपल्याला एकाच देवीची मूर्ती नऊ दिवस पाहायला मिळते, तिथेच दहिसर बोरिवली येथील जीएसबी शाखेकडून यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे नऊ नाही तर 11 रूपं दाखवण्यात येणार आहे, तेही एकाच मूर्तीच्या माध्यमातून. हे मंडळ, गेल्या 18 वर्षांपासून नवरात्री साजरा करत आहे. देवीचे हे विविध रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
25 Sep 2025 05:12 PM (IST)
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे.मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वारंवार रंगमंचावर आणि पडद्यावर साकारले गेले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा – आवली प्रेक्षकांसमोर फारशी उलगडली नाही.आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रथमच आवलीचे वास्तवाशी घट्ट जोडलेले चित्रण पाहायला मिळणार आहे.
25 Sep 2025 04:50 PM (IST)
नॉर्वे या देशातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांकडून चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेला मदतीचा हात दिला जात आहे येथील गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना वर येण्यासाठी शैक्षणिक व इतर मदत दिली जात आहे,. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पूर्वीचा काळ व आत्ताचा काळ बदलला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी असून त्यासाठी चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचे हे कार्य असेच चालू राहू दे या साठी त्यांना शुभेच्छा" असे वक्तव्य आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथील चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
25 Sep 2025 04:45 PM (IST)
महाराष्ट्र सह बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली शेतकरी पूर्णतः खचून गेला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलडाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून चक्क शोधून देणार्याला 11 रुपये बक्षिस ही ठेवण्यात आले आहे.
25 Sep 2025 04:40 PM (IST)
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा फटका राज्यातील मराठवाडा, विदर्भ यांसह उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका यांसह राहता, श्रीरामपूर, राहुरी तालुका या भागांमध्ये देखील अतिवृष्टीने मोठा फटका बसलेला आहे. अहिल्यानगर तालुक्याला देखील चार-पाच दिवसांच्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला असून तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर तालुक्यातील बुरुड गावात सीना नदीचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने तसेच अतिवृष्टीच्या पावसामुळे शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतात लावलेले पिके साचलेल्या पाण्यामुळे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. शेतातील ऊस, मका, कापूस, मूग, तूर, सोयाबीनला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे.
25 Sep 2025 04:35 PM (IST)
कल्याण -शीळ रस्त्यावर पलावा पूलाच्या बाजूला असलेले महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी दाखल केलेली जनहित याचिका हाय कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका का फेटाळली गेली आहे? अजून याचा तपशील येणे बाकी आहे. तपशील आल्यानंतर आम्ही योग्य ती पुढची कारवाई करु असे मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
25 Sep 2025 04:30 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून उत्तन परिसराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना या आराखड्यावरील हरकती (आक्षेप) व सूचना नोंदवण्यासाठी एक महिन्याचा, म्हणजेच ३० दिवसांचा कालावधी दिला आहे.
25 Sep 2025 04:25 PM (IST)
'स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत आज 25 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'एक दिवस, एक साथ, एक तास' ही सखोल स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी लोकसहभागातून भव्यतम स्वरूपात राबविण्यात आली. पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे अपोलो हॉस्पिटलपासून टेकडीच्या माथ्यापर्यंत पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह ७५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मॉर्निंग वॉकर्स, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध महाविद्यालयांचे एनएसएस विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली.
25 Sep 2025 04:20 PM (IST)
खोपोली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज पहाटे शहरातील काटरंग भागात एका फ्लॅट वर धाड मारली व तेथे जुगार खेळणाऱ्या 17 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जवळपास साडे चार लाख रुपये जप्त केले. आणि या 17 जणांनवर जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे कारवाई केली.
25 Sep 2025 04:12 PM (IST)
जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी २३ सप्टेंबर रोजी पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली आणि त्यांना धीर दिला. नैसर्गिक संकटात घाबरून न जाता त्याचा धैर्यान सामना करा असे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले. "प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर असून, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रा. शिंदे यांनी दरडवाडी येथे पावसाने खराब झालेल्या पुलाची आणि मोहरी येथील तलावाची पाहणी केली. मोहरी गावात त्यांनी नदीच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीचे व पिकांचे नुकसान पाहिले. जातेगाव येथे पुराच्या पाण्याने शेतजमिनी खरडून गेल्या होत्या आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. प्रा. शिंदे यांनी या सर्व नुकसानीची पाहणी केली.
25 Sep 2025 04:05 PM (IST)
हैद्राबाद गॅझेटचा जीआर रद्द रण्यात यावा, या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तुषार वाढोणकर आणि चंद्रशेखर देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
25 Sep 2025 03:55 PM (IST)
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टाचा मोठा फटका बसला आहे. नद्यांना पूर आल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. या परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. मंदिराकडून तब्बल1700 फूड पॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.
25 Sep 2025 03:45 PM (IST)
युवकांच्या आंदोलनामुळे लेह जिल्ह्यातील वातावरणं तापलं आहे. संतप्त आंदोलकांनी वाहने जाळली आहे. आंदोलनात चौघांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 15 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण करत होते.
25 Sep 2025 03:35 PM (IST)
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कुमशेत गावातील ठाकर वस्तीवरील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने सावज बनवले. जुन्नर तालुक्यात बिबटयाने माणसांना ठार केल्याची या महिन्यातील हि तिसरी घटना आहे.
25 Sep 2025 03:25 PM (IST)
उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या धाराशिवच्या इटकुरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सर्व ग्रामस्थांशी, तसेच शेतकऱ्यांशी सवांद साधला. तसेच हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारकडून जाहीर करून घेऊ असंही त्यांना शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे.
25 Sep 2025 03:24 PM (IST)
Bihar Election 2025: बिहारमध्ये या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहारमध्ये राजकारण तापले आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप, कॉँग्रेस, एमआयएम, राजद सर्व अन्य पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. एनडीएची सत्ता आल्या सकोण मुख्यमंत्री होणार याबाबत त्यांनी दावा केला आहे.
25 Sep 2025 03:15 PM (IST)
बीड येथील गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथील शेतकऱ्याचे 5 ते 6 क्विंटल कांदा वाहून गेल्याची घटना घडली आहे. सिंदफना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात गेलं साहित्य वाहून गेलं आहे. गेवराई तालुक्यातील भगवान गव्हाने नामक शेतकऱ्याचे कांदे आणि सौर ऊर्जेचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
25 Sep 2025 03:05 PM (IST)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका अनिर्णयीत राहिली. या मालिकेमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली होती. आता भारताचा संघ पुढील मालिका ही वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे, या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
25 Sep 2025 01:55 PM (IST)
अमेरिका (America)आणि भारतामध्ये रशियान तेल खरेदीवरुन तणाव अजूनही आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर (Tarrif) लादला असून पुन्हा रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे उर्जा मंत्री क्रिस राइट यांनी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी भारताला जगातील इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदीचा सल्ला दिला.
25 Sep 2025 01:45 PM (IST)
गुरुवारी ऑटो दिग्गज टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये अचानक ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. टाटा मोटर्सच्या उपकंपनी, जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) वर सायबर हल्ल्याच्या वृत्तामुळे ऑटो शेअर्समध्ये ही घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर टाटा मोटर्सचे शेअर्स ₹६५५.३० या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरले.एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, टाटा मोटर्सची उपकंपनी जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) गंभीर सायबर हल्ल्याचा सामना करत आहे. कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या एकूण नफ्यापेक्षा जास्त आर्थिक नुकसान होऊ शकते.
25 Sep 2025 01:40 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या मालिकेच्या भागात वल्लरी आणि तिचा पती मनोज पुन्हा प्रेम खुलताना दिसणार आहे. आगामी भागामध्ये वल्लरीची मनोजला खंभीर साथ देताना दिसणार आहे.
25 Sep 2025 01:35 PM (IST)
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे, हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. पहिला सामना बांग्लादेशच्या संघाने जिंकला होता, तर दुसरा सामना बांग्लादेशचा भारताविरुद्ध झाला. या सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सुपर 4 चा पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला पराभुत करुन फायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
25 Sep 2025 01:30 PM (IST)
ऊसतोडीच्या कामावर येत नसल्याच्या रागातून मुकादमाने ऊसतोड मजुरासह त्याच्या 17 वर्षीय मुलाचे अपहरण केले. करुन जालन्यात डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. तसेच अपहतच्या नातेवाईकांडे 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली. हा प्रकार २० ते २२ सप्टेंबर दरम्यान घडला.
25 Sep 2025 01:25 PM (IST)
तिरुपती बालाजी मंदिराचे भाविक संपूर्ण देशामध्ये आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविक येतात. सर्वात श्रीमंत अशा मंदिरामध्ये सढळ हाताने भाविक देवाच्या श्रद्धेने दान करत असतात. मात्र आता तिरुपती बालाजी मंदिराच्या दानपेटीबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. मंदिरातील दानपेटीमधील पैसे चोरी झाली असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून मंदिराच्या ट्रस्टने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
25 Sep 2025 01:15 PM (IST)
परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा आहे. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
25 Sep 2025 01:15 PM (IST)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, आणि जळगाव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, शेती, घरे, जनावरे आणि व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.डोळ्यांदेखत शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत काही ठिकाणी मदतकार्य सुरू केल्याचेही सांगितले जात आहे.
25 Sep 2025 01:05 PM (IST)
आज प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मासिक स्टेट ऑफ द इकॉनॉमी अहवालात म्हटले आहे की, पॉलिसी रेपो दरात १०० बेसिस पॉइंटची कपात, कुटुंबांसाठी आयकर सवलत आणि रोजगार वाढीसाठी उपाययोजना यामुळे उच्च गुंतवणूक आणि विकासाचे एक चांगले चक्र सुरू होऊ शकते. वस्तू आणि सेवा कर (GST) दरांमध्ये अलिकडेच झालेल्या कपातीमुळे किरकोळ किमती कमी होतील आणि उपभोग मागणी वाढेल, असे त्यात म्हटले आहे.
25 Sep 2025 01:00 PM (IST)
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने एका तरुणाने थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणीचे वडील गंभीर जखमी झाले असून आई देखील जखमी झाली आहे.
25 Sep 2025 12:45 PM (IST)
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटल जात. देशभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात तयारी करतात असतात. मात्र एका पठ्ठ्याने थेट विद्यापीठालाच गंडा घातल्याच समोर आल आहे. मी लंडन रिटर्न आहे, एका माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला एआय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला २ कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही. नंतर समजलं फसवणूक झाली आहे म्हणून. पोलिसांनी हैद्राबादमधून आरोपीला अटक केली आहे.
25 Sep 2025 12:30 PM (IST)
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पुणे पोलिसांनी काळा प्रकार उघडकीस आणला आहे. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली आहे. दोन ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई केल्या आणि मुलींची सुटका केली.
25 Sep 2025 12:00 PM (IST)
"36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं ? काय समजून घेतलं ? पाण्याच्या बॉटल वर फोटो लावून होत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचं आम्ही स्वागत करतो, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने काय केलं? कोणत पथक पाठवलं. शासन हे मुर्दाड आहे," अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
25 Sep 2025 11:50 AM (IST)
महाराष्ट्र सह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलढाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत. मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून त्यांना शोधून देण्याची मागणी बुलढाणा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.
25 Sep 2025 11:40 AM (IST)
बुधवारी (24 सप्टेंबर) रात्री दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या वायव्येकडील झुलिया राज्यात 6.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचा झटका बसला आहे. यामुळे व्हेनेझुएलात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाचे केंद्र झुलियामधील मेने ग्रांडे शहरापासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर होते. याचा फटका कोलंबियाला ही बसला आहे. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
25 Sep 2025 11:33 AM (IST)
Typhoon Ragasa Update : जगातील सर्वात शक्तीशाली वादळ रगासाने आशियामध्ये हाहा:कार माजवला आहे. या वादळाने हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये प्रचंड विनाश घडवला आहे. टायफून रगासा आशियामध्ये जोरदार धडकले असून तैवानमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर फिलिपाइन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि हॉंगकॉंमधून कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु ९० लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत.
25 Sep 2025 11:31 AM (IST)
पंडित दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. ११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.
25 Sep 2025 11:31 AM (IST)
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ओला दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2025
25 Sep 2025 11:20 AM (IST)
भाजप नेते विनय कटियार यांनी अयोध्येतील मशीदवर विधान केले आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विनय कटियार म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत मशीद बांधू दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी येथून निघून जावे. एनओसी प्रलंबित असल्याने धन्नीपूर मशिदीच्या योजनेवर स्थानिक प्राधिकरणाच्या आक्षेपाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कटियार यांनी हे विधान केले.
25 Sep 2025 11:10 AM (IST)
“शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्या अपेक्षा पूर्ण करणार. अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केलेली मदत सर्वांसमोर आहे.आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.”शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून विरोधी पक्षांनी सुद्धा सर्व मदत केली पाहिजे. सढळ हस्ते मदत करावी, फक्त पर्यटन करु नये” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
25 Sep 2025 10:15 AM (IST)
गायिका रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गुरुवारी एका इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने गोंडस मुलीला हातात धरून हा फोटो शेअर केला आहे. रिहाना तिच्या मुलाचे नाव रॉकी आयरिश मेयर्स ठेवले आहे. तसेच या फोटोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिहानाने २०२२ मध्ये तिचा प्रियकर रॉकीसोबत तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. तिने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता, २०२५ मध्ये, तिने तिच्या तिसऱ्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आहे.
25 Sep 2025 10:10 AM (IST)
नुकताच ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला आहे. पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. त्यातील एका व्हिडीओनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो व्हिडीओ आहे शाहरुख खान आणि ‘नाळ २’ चित्रपटामधील बालकलाकार भार्गव जगताप यांचा. शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचं कौतुक होताना दिसत आहे.
25 Sep 2025 10:05 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघांमधील सुरू असलेला वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय संघाने आशिया कप लीग सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सने आणि सुपर ४ सामन्यात सहा विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १४ सप्टेंबरच्या सामन्याबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी भारतीय कर्णधाराकडून उत्तर मागितले आहे.
25 Sep 2025 09:59 AM (IST)
इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे ट्रेनी इंजिनियर-I पदांसाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2025 आहे.
25 Sep 2025 09:55 AM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघीनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक हटके शो आणला आहे. या शोचं नाव आहे “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हे आहे. याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात सलमान खान आणि आमिर खान पहिले पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले आहेत. या शोमध्ये सलमानने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. आता अभिनेता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
25 Sep 2025 09:50 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:45 AM (IST)
भारतात आज 25 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,574 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,652 रुपये आहे. भारतात काल 24 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,570 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,606 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,678 रुपये होता.
25 Sep 2025 09:40 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. त्यातच क्रेडिट विभागात १०० टक्के नोकरी, हमखास २५ ते ३५ हजार पगार अशा आश्वासनांनी एका बनावट बँकिंग अकॅडमीने तब्बल २४ विद्यार्थ्यांना १५ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबर दरम्यान जवाहनगर परिसरातील चेतक घोडा चौकात घडला.
25 Sep 2025 09:36 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच आता पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
25 Sep 2025 09:13 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:03 AM (IST)
जागतिक बाजारातील कमकुवतपणा लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज २५ सप्टेंबर रोजी देखील घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात तोटा वाढण्याची शक्यता आहे आणि आज शेअर बाजाराची सुरुवात नाकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता आहे.