गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Venezuela 6.2 Earthquake : भूकंप ( Earthquake) ही निसर्गाची सर्वात भीषण आठवण करून देणारी घटना आहे. पृथ्वीच्या गर्भातून अचानक होणारा हलकासा कंप काही क्षणात मानवी जीवनात भीती निर्माण करतो. नेमके तसेच दृश्य बुधवारी (24 सप्टेंबर 2025) रात्री दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला(Venezuela) या देशात पाहायला मिळाले. व्हेनेझुएलाच्या वायव्येकडील झुलिया राज्यात 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा एक शक्तिशाली भूकंप झाला. रात्री उशिरा झालेल्या या धक्क्यांमुळे सामान्य नागरिक भीतीने घराबाहेर धावले. स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, या भूकंपाचे केंद्र झुलियामधील मेने ग्रांडे शहरापासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर होते. विशेष म्हणजे, कोलंबियामध्येही या भूकंपाचे झटके जाणवले.
मेने ग्रांडे हे ठिकाण माराकाइबो सरोवराजवळ आहे आणि हा भाग व्हेनेझुएलाच्या सर्वात महत्त्वाच्या तेल उत्पादक प्रदेशांपैकी एक मानला जातो. त्यामुळे अचानक आलेल्या भूकंपामुळे आर्थिक दृष्ट्याही चिंता निर्माण झाली होती. परंतु, देशाचे दळणवळण मंत्री फ्रेडी नानेझ यांनी नागरिकांना धीर देत सांगितले की झुलिया व्यतिरिक्त बारिनास येथेही भूकंपाचे झटके जाणवले, परंतु कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. बारिनासमध्ये ३.९ आणि ५.४ रिश्टर स्केलचे छोटे भूकंप नोंदले गेले.
हे देखील वाचा : World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण
व्हेनेझुएला हा जगातील भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक मानला जातो. गेल्या वर्षभरातच या देशाला अनेकदा भूकंपाचा सामना करावा लागला आहे.
या घटनांमुळे नागरिक सतत भीतीच्या छायेत जगत आहेत.
#Venezuela l Sismo de magnitud 6.1 fue percibido en varias ciudades de Venezuela. pic.twitter.com/WKUtYINaDZ — Señal Capital (@senalcapital) September 25, 2025
credit : social media
फक्त व्हेनेझुएलाच नव्हे, तर भारतातही या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले. मंगळवारी रात्री (२३ सप्टेंबर) महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला गावात २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. सुदैवाने हा भूकंप फारच कमी तीव्रतेचा असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. या भूकंपाचे केंद्र लातूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटर पश्चिमेला होते. लातूर जिल्हा हा भूकंपाशी जोडलेला विषय असला तरी आजही लोकांच्या मनात १९९३ च्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी ताज्याच आहेत. त्यामुळे छोटासा धक्का जरी बसला तरी नागरिकांमध्ये तातडीने भीतीचे वातावरण निर्माण होते.
याच महिन्यात, १४ सप्टेंबर रोजी आसाममध्ये ५.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्र उदयपुरी जवळ होते. या धक्क्यांमुळे आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात घबराट पसरली. सुदैवाने, या वेळी देखील कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
गेल्या काही महिन्यांत जगभरात भूकंपाच्या वारंवार घटनांनी वैज्ञानिकांनाही विचारात पाडले आहे.
हे देखील वाचा : Navarashtra Navdurga : ‘जिद्द ना सोडली’, योगिता मानेने बस चालवत रचला इतिहास; महिला असूनही पेलली जबाबदारी
भूकंप केवळ इमारती हादरवत नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. अचानक आलेला धक्का, भीतीने घराबाहेर पळणारे लोक, मुलांचे रडणे ही दृश्ये मानवाला असुरक्षिततेची जाणीव करून देतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की :
व्हेनेझुएलासारख्या तेलसमृद्ध पण भूकंपप्रवण देशाला पुन्हा एकदा निसर्गाने हादरवले. भारतातही लहान भूकंपांनी लोकांना दचकवले. आजच्या तंत्रज्ञानामुळे तातडीने माहिती मिळते आणि प्रशासनाकडून लोकांना धीर देणारी पावले उचलली जातात. तरीही भूकंपासारख्या आपत्तीसमोर मानवाची असहाय्यता स्पष्ट दिसून येते.






