देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. फिरण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. वाराणसी आणि प्रयागराज नंतर, मथुरा हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. विशेषतः कान्हाचे शहर म्हणून मथुरा हे ठिकाण जगभर सुप्रसिद्ध आहे. पण जर तुम्ही मथुरेला जात असाल तर मंदिरांव्यतिरिक्त काही सुंदर ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकता. या ठिकाणांपैकीच एक आहे कंसचा प्राचीन किल्ला, तुम्ही या किल्ल्याला भेट दिली नसेल तर तुम्ही आयुष्यातील एक उद्भूत अनुभव मिस करत आहात.
मथुरेमध्ये वसलेले प्रेम मंदिर, कांस किल्ला, द्वारकाधीश मंदिर, निधीवन मंदिर आणि बांके बिहारी मंदिर यासारखी अनेक मंदिरे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गणली जातात. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक मथुरेला भेट देण्यासाठी येतात. तथापि, मथुरेच्या मंदिरांसह काही आश्चर्यकारक ठिकाणांना भेटी दिल्याने तुमच्या प्रवासात आकर्षण वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मथुरेतील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल. मथुरेला गेलात तर या ठिकाणांना भेट द्यायला अजिबात विसरू नका.
हेदेखील वाचा – अजब! या देशात नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी दिली जाते बक्कळ पैशांची ऑफर, असे का? जाणून घ्या
मथुरेतील कुसुम सरोवर राधा-कृष्णाच्या प्रेमाचा साक्षीदार मानला जातो. असे मानले जाते की, राधा राणी भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी या तलावावर येत असत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कुसुम सरोवर सुमारे 450 फूट लांब आणि 60 फूट खोल आहे. अशा परिस्थितीत ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी कुसुम सरोवरची सहल सर्वोत्तम ठरू शकते. कुसुम सरोवरच्या संध्याकाळच्या आरतीचे दृश्य तुमच्या प्रवासाला मोहिनी घालू शकते.
हेदेखील वाचा – रेल्वेने प्रवास करताय… मग लाल अन् निळ्या डब्यात काय फरक असतो माहिती आहे का? जाणून घ्या
डॅम्पियर पार्कमध्ये वसलेले मथुरा म्युजियम 1874 साली बांधण्यात आले होते. या संग्रहालयात अनेक पुरातत्वीय गोष्टींशिवाय माती, सोने-चांदीपासून बनवलेली भांडी आणि सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. मथुरा संग्रहालयात जुन्या चित्रांबरोबरच कलाकृती, सोने, चांदी आणि तांब्याची नाणी अशा अनेक प्राचीन गोष्टी पाहायला मिळतात.
इतिहासात रुची असलेल्या लोकांसाठी इथला कंस किल्ला भेट देण्यासाठीच एक उत्तम पर्याय आहे. मथुरेतील यमुना नदीच्या काठावर हा किल्ला वसला आहे. हा किल्ला गंगा घाट आणि गौ घाटाच्या अगदी जवळ आहे.कंसच्या किल्ल्याला मथुरेचा जुना किल्ला असेही म्हणतात. याला भेट देण्यासाठी दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक मथुरेला येत असतात. या किल्ल्याचा इतिहास महाभारतापेक्षा जुना आहे. महाभारताच्या काळात हा किल्ला पांडवांसाठी विश्रामगृह असायचा.
इतिहासकारांच्या मते, 16व्या शतकात जयपूरच्या राजा मानसिंहने हा किल्ला पुन्हा बांधला. कंस किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंतची वेळ आहे. या दरम्यान तुम्ही कधीही किल्ल्याला भेट देऊ शकता. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.