दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध
काय घडलं नेमकं?
बीड जिल्ह्यातील जवारी तालुक्यातील चोपड्याचीवाडी येथील कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरून ३० लोकांनी सायंकाळच्या सुमारास लाठ्याकाठ्यांनी महिलांना मारहाण करत घरांसह साहित्यांची तोडफोड केली. या मारहाणीमध्ये तीन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णलयात सध्या उपचार सुरु आहे.
कारण काय?
मारहाण झालेल्या कुटुंबीयांनी शासनाच्या गायरानावर अतिक्रमण केले असून तिथे गेलेल्या दोन मेंढ्या मारून मेंढपाळ लोकांना मारहाण केली. यावरून हा वाद वाढला आणि थेट चार घराकची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल
तलवाडा पोलीस ठाण्यात ३० आरोपींच्या विरोधात छेडछाड आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या गटाने तलवाडा पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.
जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली
राज्य मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेण्यात येत आहे. हजारो लाखो तरुण- तरुणी पोलीस होण्यासाठी पोलीस भरती परीक्षा देत आहेत. बीड जिल्ह्यात देखील पोलीस भरती घेण्यात येत आहे. मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.
Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
Ans: सुमारे 30 जणांच्या जमावाने हल्ला केला.
Ans: तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Ans: मेंढ्या गायरान परिसरात आल्याने झालेला क्षुल्लक वाद वाढल्याची माहिती.






