
लता मंगेशकरांनी १९५९ साली आंदोलन केल्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

लता मंगेशकर यांनी फक्त एकच दिवस शाळेत हजेरी लावली. कारण त्यांना त्यांच्यासोबत त्यांची बहिण आशा भोसले यांना आणण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

लता मंगेशकर यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे नाव हेमा ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या वडिलांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून प्रेरणा घेत त्यांचे नाव लता असे ठेवण्यात आले.

लता मंगेशकर यांना २००१ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतरत्न हा भारतीय नागरिकाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

लता मंगेशकर या एकमेव भारतीय गायिका आहेत ज्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये (१९७४) गाणे गायले आहे.

२६ जानेवारी १९६३ रोजी जेव्हा लता मंगेशकर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणं गायलं होतं. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले होते.






