Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘राजकारण लई वंगाळ!’ विलीनीकरणाच्या दाव्यावरून शिवसेनेच्या वृत्तपत्रातून भाजपवर टीका

जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2026 | 10:36 AM
Maharashtra Politics: ‘राजकारण लई वंगाळ!’ विलीनीकरणाच्या दाव्यावरून शिवसेनेच्या वृत्तपत्रातून भाजपवर टीका
Follow Us
Close
Follow Us:
  • सुनेत्रा पवारांचा शपथविधी, अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न
  • अजित पवारांच्या निधनानंतर पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको
  • राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ नये हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारण एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, या सगळ्या गदारोळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्यासाठी अजित पवार सकारात्मक होते, असा दावा करण्यात आला अजित पवार आणि आपल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विलीनीकरणासाठी चर्चा सुरू होत्या.

येत्या १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा केली जाणार होती. असेही सांगण्यात आले. तर, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटात विलीन करायची असती तर त्यांनी आधी आमच्याशी चर्चा केली असती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला.या सगळ्या घडामोडींवर दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

Beed Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले आणि चिमुकलीवर…

“अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे.” अशी टिका करण्यात आली आहे.

“अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीने दुसरा धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वाने मिळाले असे नाही. मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेने झाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.” असा प्रश्नही  शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

शरद पवार यांनी शांतपणे याचे उत्तर दिले आहे. ‘‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे व अजित पवारांनंतर पटेल, तटकरे वगैरे लोक पक्षाची धुरा सांभाळत आहेत.’’ सुप्रिया सुळे यांनीही त्याच पद्धतीने मत व्यक्त केले. म्हणजे सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह दुसऱ्याच दिवशी मुंबईला पोहोचल्या व आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला राजभवनात जात आहोत याचा सुगावा कुटुंबाला लागू दिला नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगायचे तर ‘‘सध्या राजकारण लई वंगाळ झालं आहे’’

 

Web Title: Maharashtra politics politics is very wicked shiv sena criticizes bjp over the merger claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या सविस्तर बातम्या वाचा एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या सविस्तर बातम्या वाचा एका क्लिकवर

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य
2

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण
3

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
4

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.