Shreyas Iyer’s Career : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसाठी सध्या काहीही बरोबर नाही. वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड कसोटी मालिकेत फ्लॉप झाल्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. यानंतर बीसीसीआयने यावेळी त्याला केंद्रीय करारातही स्थान दिले नाही. अय्यरला दुलीप ट्रॉफीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी होती. मात्र, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. श्रेयसला 4 डावांमध्ये केवळ 104 धावा करता आल्या. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टेलिग्राफला मोठं वक्तव्य दिले आहे. सध्या कसोटी संघात अय्यरला स्थान नसल्याचे त्याने म्हटले आहे.
अय्यरसाठी कसोटी संघाचे दरवाजे बंद
श्रेयस अय्यरबद्दल बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘यावेळी श्रेयसला कसोटी संघात स्थान नाही. तो कोणाची जागा घेईल? याशिवाय दुलीप करंडक स्पर्धेत विशेषत: काल (रविवार) त्याची शॉट निवड चिंतेचा विषय ठरली आहे. तो चांगला सेट झाला होता आणि मग अचानक असा शॉट खेळला (डावा हात फिरकीपटू शम्स मुलानी विरुद्ध). तुम्ही सेट झाल्यावर आणि नंतर सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करा. त्यामुळे त्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा.
श्रेयस अय्यरसाठी इराणी चषकासाठी संधी
बोर्डाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘श्रेयस इराणी चषकासाठी (1 ऑक्टोबरपासून लखनऊमध्ये सुरू होणाऱ्या) मुंबई संघात सामील होऊ शकतो. जरी त्याची बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (6 ऑक्टोबरपासून) निवड झाली असेल. तो अजूनही इराणी चषक खेळू शकतो आणि त्यानंतर दुसऱ्या टी-२०साठी उपलब्ध होऊ शकतो.
अन्यथा रणजी ट्रॉफीमध्ये संधी
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘आता जरी तो इराणी चषकात खेळला नाही तरी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये धावा करण्याची संधी आहे. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात तो चांगली फलंदाजी करीत होता तेव्हा फार काळ लोटला नव्हता. त्याला दुखापतही झाली आहे, ज्याचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्ये अजून एक फेरी बाकी आहे, तो शतक ठोकेल का कुणास ठाऊक. त्यांना फॉर्म परत मिळवायचा आहे. शॉर्ट बॉलवर होणाऱ्या त्रासामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाणार नसण्याची शक्यता आहे. पण घरी त्याच्या धावांकडे दुर्लक्ष करता येत नाही.