Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन, नैसर्गिक साखरेमुळे शरीराला पोहचेल हानी

मधुमेह झाल्यानंतर आहारात अतिसाखर युक्त पदार्थांचे आणि फळांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचते. रक्तात वाढलेली साखर शरीराला हानी पोहचवते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2025 | 08:50 AM
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि सतत जंक फूड आणि जीवनशैलीतील बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात, मात्र कालांतराने शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण न ठेवल्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढण्यास सुरुवात होते. मधुमेह वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांनासुद्धा हानी पोहचते. त्यामुळे आहारात कमी साखरेचे आणि गोड पदार्थ खाऊ नये. मधुमेह झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करून सतत गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं जड झाल्यासारखं वाटत? ‘हे’ उपाय करून मिळवा डोके दुखीपासून आराम

कायम निरोगी राहण्यासाठी आहारात फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण नैसर्गिक गोडवा असलेल्या फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात अतिरिक्त साखर वाढू लागते. ज्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागेल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही फळे विषा सामान ठरतात.

आंबा:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. आंब्यांमध्ये २५ ते ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. आंब्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ५१ ते ६० इतके असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करू नये. इतर गोड पदार्थांसोबत आंब्याचे अजिबात सेवन करू नये.

केळी:

केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात जास्त प्रमाणात केळी खाऊ नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता असते. केळ्यांमध्ये २०–२५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे आहारात नियमित केळी खाऊ नये.

द्राक्ष:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप जास्त आवडतात. नैसर्गिक गोडवा असलेल्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी द्राक्षांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर ते नियंत्रणात ठेवणे अतिशय कठीण होऊन जाते.

धक्कादायक! मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, जाणून घ्या ब्रेन इटिंग अमिबाची लक्षणे आणि उपाय

FAQs (संबंधित प्रश्न)

मधुमेह म्हणजे काय?

तुमचे शरीर इन्सुलिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे रक्तातील ग्लुकोज (साखर) शरीरातील पेशींमध्ये पोहोचवते. मधुमेहामध्ये, तुमचे शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार केलेले इन्सुलिन योग्यरित्या वापरत नाही. यामुळे ग्लुकोज रक्तातच राहते आणि रक्तातील साखर वाढते.

मधुमेहाची लक्षणे?

खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, सतत थकवा जाणवणे, अस्पष्ट दिसणे, जखमा लवकर न भरणे आणि वजन कमी होणे ही काही इतर लक्षणे आहेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Diabetic patients should not consume these fruits by mistake the natural sugar will cause harm to the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Diabetics
  • healthy fruits
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा
3

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर
4

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.