
पोटात कायमच जडपणा जाणवतो? आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरीच तयार करा आयुर्वेदिक चूर्ण
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय?
आयुर्वेदिक चूर्ण खाण्याचे फायदे?
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
शरीरातील सर्वच आजार आतड्यांपासून सुरु होतात. दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटात जडपणा जाणवणे, ऍसिडिटी झाल्यासारखे वाटणे, अपचन इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही आणि आंबट ढेकर येऊन अन्ननलिकेमध्ये येऊन पचनास अडथळे निर्माण करतात.
आतडे आणि मेंदू एकमेकांशी जोडलेला असतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडल्यानंतर ऍसिडिटी, डोकेदुखी, अस्वस्थपणा किंवा शरीरसंबंधित गंभीर लक्षणे दिसू लागतात. पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी कायमच सोडा किंवा वेगवेगळे सप्लिमेंट्स प्यायले जातात. पण त्याऐवजी आयुर्वेदिक चूर्ण पिऊन आतडे स्वच्छ करावे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आयुर्वेदिक चूर्ण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक चूर्ण केवळ आतडे स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप जास्त मदत करेल.
पचनक्रिया सुधरण्यासाठी सप्लिमेंट्स पिण्याची कोणतीही आवश्यकता नाही. यासाठी घरी तयार केलेले आयुर्वेदिक चूर्ण प्यावे. यासाठी बडीशेप, ओवा, जिरं, आवळ्याची पावडर एवढेच साहित्य लागणार आहे. कढई गरम करून त्यात बडीशेप, ओवा आणि जिरं वेगवेगळं लालसर होईपर्यंत भाजा. भाजलेले पदार्थ थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर मिक्सच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेल्या पावडरमध्ये आवळ्याची पावडर मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा पावडर मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.
बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या त्रासाने त्रस्त असाल तर नियमित अर्धा चमचा आयुर्वेदिक चूर्ण पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीर स्वच्छ होईल. आवळ्यात असलेले गुणकारी घटक शरीराला आवश्यक विटामिन सी, फायबर आणि इतर पोषक घटक देतात. त्यामुळे नेहमीच सेवन केल्यास शरीराला कोणतेही तोटे होणार नाहीत. बडीशेपचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे स्नायू शिथिल होण्यास मदत होतात. ओवामुळे पाचक एन्झाईमचा स्राव वाढतो, ज्यामुळे गॅस आणि अपचन होत नाही.
Ans: आयुर्वेदिक चूर्ण हे विविध औषधी वनस्पती, मसाले किंवा बियांचे बारीक पूड स्वरूपातील मिश्रण असते. पचनास मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट तक्रारींसाठी काही प्रकारचे चूर्ण वापरले जातात. मात्र त्याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.
Ans: अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, जास्त तेलकट किंवा मसालेदार आहार, कमी पाणी पिणे, तंतुमय आहाराचा अभाव किंवा काही पचनसंस्थेच्या आजारांमुळे पोटात जडपणा जाणवू शकतो.
Ans: पुरेसे पाणी पिणे, तंतुमय आहार (फळे, भाज्या, कडधान्ये) घेणे, नियमित व्यायाम करणे, वेळेवर जेवणे आणि अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न टाळणे या सवयी पचनासाठी फायदेशीर ठरतात.