घामामुळे शरीराला सतत खाज सुटते? 'हे' घरगुती उपाय करून मिळवा खाजेपासून तात्काळ आराम, त्वचा होईल स्वच्छ
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
चेहऱ्यावर रॅश आल्यानंतर उपाय?
साधं दूध पिण्याचे फायदे?
देशभरात सगळीकडे कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगाला खूप जास्त घाम येतो. घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते. पण थंड ठिकाणी किंवा पंख्याच्या खाली उभे राहिल्यानंतर अंगाला आलेला घाम सुकून जातो आणि शरीरावर घाणीचे कपटे तसेच राहतात. शरीरावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे सतत अंगाला खाज येणे, अंगावर लाल रॅश उठणे किंवा त्वचेवर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या वाढल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेली घामोळ्याची किंवा थंड वाटणारी पावडर आणून ती लावतात. पण केमिकल युक्त पावडरचा वापर केल्यामुळे फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात अंगाला येणाऱ्या खाजीपासून नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड दूध प्यावे. काहींना थंड दूध प्यायला अजिबात आवडत नाही. अशावेळी गरम केलेले दूध तुम्ही थंड करून सुद्धा पिऊ शकता. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला खूप जास्त घाम येतो. अशावेळी थंड पाणी न पिता दूध प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच शरीरात थंडावा टिकून राहील.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना वाढत्या उष्णतेमुळे पित्त आणि ऍसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो. पित्त वाढल्यामुळे पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात आग झाल्यासारखे वाटते. याशिवाय काहींना सतत तोंड येणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंड दूध प्यावे. दूध प्यायल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
अंगावर वाढलेल्या खाजेपासून नियंत्रण मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. मीठ टाकल्यामुळे शरीरावर वाढलेले विषाणू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच अंघोळ करताना साबण वापरण्याऐवजी बॉडी वॉशचा वापर करावा. उन्हामुळे अंगावर जात घामोळं किंवा रॅश उठले असतील तर कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करावी. कडुलिंबाचे पाणी अंगावर वाढलेले जंतू नष्ट करण्यासाठी मदत करते.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी सुद्धा प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ राहील. आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर तर काहीवेळा संपूर्ण शरीरावर मोठे मोठे पिंपल्स आणि खाज उठते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.






