
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ
जेवणाच्या डब्यात नेहमीच कोणती भाजी बनवावी? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नेहमीच कढधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. लहान मुलांना बटाटा भाजी खायला खूप जास्त आवडते. पण वारंवार बटाटा खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रताळ्याची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. भेंडी, शिमला मिरची, बटाटे खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट रताळ्याची भाजी बनवावी. रताळी चवीला गोड असतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन रताळी खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)