
IRCTC घेऊन आला महायात्रा टूर पॅकेज, जगन्नाथ पुरीपासून कामाख्या मंदिरापर्यंत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची घेता येईल भेट
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
ही विशेष ट्रेन राजकोटपासून सुरु होऊन ती पुढे सुरेंद्रनगर, वीरमगाम, साबरमती जंक्शन, नडियाद, आनंद, छायापुरी, गोधरा, दाहोद, रतलाम, उज्जैन आणि संत हिरदाराम नगरसह अनेक रेल्वे स्टेशनवर थांबेल. यात्रेतील सर्वात पहिले ठिकाण ओडिशातील पुरी हे असेल. इथे भाविक जगन्नाथ पुरींचे दर्शन घेतील. यासोबत त्यांना पुरीतील समुद्रकिनारा आणि स्थानिक बाजारपेठांनाही भेट देण्याची संधी दिली जाईल. दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर आणि भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिराला भेट देता येईल.
ओडिशानंतर ट्रेन आसामच्या गुवाहटी येथे पोहचेल जिथे भाविक शक्तीपीठ असलेल्या माँ कामाख्या मंदिराला भेट देतील. गुवाहटीनंतर ही यात्रा बिहारच्या बोधगया इथे पोहचली. इथे भाविक महाबोधि मंदिर, विशाल बुद्ध प्रतिमा, विष्णुपद मंदिर आणि माँ सर्वमंगल गौरी शक्तीपीठाला भेट देतील. या स्थळांना हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.
आसाम नंतर यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे पोहचेल जिथे काशी विश्वनाथ मंदिराचे आणि माता अन्नपूर्णा मंदिराचे दर्शन घेतले जाईल. येथील गंगा घाटवर चांगला वेळ घालवता येईल. वाराणसी नंतर भाविकांना अयोध्येत राम मंदिराला भेट देण्यासाठी नेले जाईल. इथे तुम्ही हनुमानगढीचेही दर्शन करु शकता.
5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप
यात्रेसाठी भाविकांना त्यांच्या सोयीनुसार स्लीपर, ३ एसी आणि २ एसी कॅटेगरीमध्ये बुकिंग उपलब्ध असेल.