Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस सतत भिजल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस कोरडे आणि निस्तेज वाटू लागतात. केसांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो कराव्यात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2025 | 01:36 PM
पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत?

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहेत. सतत पावसात भिजल्यामुळे आरोग्य बिघडते. सर्दी, खोकला इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. शरीरासोबतच केसांचे सुद्धा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत पावसात भिजल्यानंतर केस अतिशय रुक्ष आणि कोरडे वाटू लागतात. कितीही स्वच्छ केले तरीसुद्धा केसांची गुणवत्ता सुधारली जात नाही. कोरडे झालेले केस पुन्हा एकदा मुलायम आणि सुंदर करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी हेअर स्पा केला जातो तर कधी हेअर मास्क लावून केसांची काळजी घेतली जाते. पण सतत केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल आणि घरगुती असे दोन्ही उपाय केले जातात.(फोटो सौजन्य – istock)

त्वचा होईल लोण्यासारखी मऊसूत! ‘हा’ पारंपरिक पदार्थ त्वचेसाठी ठरेल वरदान, डागांपासून होईल कायमची सुटका

केसांना वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेला हेअर मास्क लावला जातो. तर कधी दही, अंड किंवा लोणी लावून केस मऊ केले जातात. मात्र यामुळे केस आणखीनच चिकट आणि तेलकट होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस आणखीनच सुंदर, उठावदार दिसू लागतील.

केस कायमच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस चमकदार, सुंदर दिसतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. याशिवाय केस स्वच्छ करताना गरम पाण्याचा अजिबात वापर करू नये. यामुळे केस आणखीनच कोरडे होण्याची शक्यता असते.

ओल्या केसांवर कधीही फणी फिरवू नये. यामुळे केस मुळांपासून तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच विंचरावे. केस विंचरण्यासाठी लाकडाच्या कंगव्याचा वापर करावा. प्लॅस्टिकच्या फणीचा वापर अजिबात करू नये. यामुळे केसांच्या मुळांना इजा होते. गुंतलेले केस सोडवण्यासाठी बोटांचा वापर करावा.

वाटीमध्ये लिंबाचा रस आणि कोमट पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. तयार केलेले मिश्रण कापसाच्या किंवा हातांच्या सहाय्याने संपूर्ण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर ३० मिनिट केसांवर लावलेले मिश्रण तसेच ठेवून घ्या आणि नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. यामुळे केसांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ होते.

डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढत चाललीयेत? आता एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, फक्त या 4 सवयींचे पालन करा

पूर्वीच्या काळी महिला केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शिकेकाईचा वापर करत असे. शिकेकाई केसांच्या मुळांना पोषण देते. शिकेकाई पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण रात्रभर तसेच झाकून ठेवा. त्यानतंर सकाळी व्यवस्थित मिक्स करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून ठेवा. ३० मिनिटं झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Is your hair dry and rough after being constantly drenched in the rain take care of your hair by following these tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश
1

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर
2

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका
3

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका

त्वचा होईल लोण्यासारखी मऊसूत! ‘हा’ पारंपरिक पदार्थ त्वचेसाठी ठरेल वरदान, डागांपासून होईल कायमची सुटका
4

त्वचा होईल लोण्यासारखी मऊसूत! ‘हा’ पारंपरिक पदार्थ त्वचेसाठी ठरेल वरदान, डागांपासून होईल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.