
भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा गावाची माहिती सांगत आहोत ज्याला सायलंट व्हिलेजच्या नावाने ओळखले जाते. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी काही खासियत असते पण या गावाला असं नाव का मिळालं यामागच कारण आपण जाणून घेणार आहोत. काही वेगळा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही या गावाला नक्कीच भेट देऊ शकता. चला हे गाव नक्की कुठे आहे आणि त्याच्या नावामागची कहाणी काय ते सविस्तर जाणून घेऊया.
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये वसलंय गाव
या सायलंट व्हिलेजचे खरे नाव डडकई असे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदोह तहसीलच्या भासेला परिसरात डोंगरांमध्ये ते वसले आहे. गावाच्या चारही बाजूने उंच हिरवेगार डोंगर आहेत. हेच कारण आहे की इथले नैसर्गिक साैंदर्य अनेक पर्यटकांना या ठिकाणाकडे आकर्षित करते. भद्रवाहपासून किमान १०५ किमी अंतरावर वसलेल्या या गावाला मिनी काश्मिर देखील म्हटले जाते.
गावाला सायलंट व्हिलेज नाव का पडलं?
गावाला मिळालेल्या अनोख्या नावामुळेच देशभरात याची एक वेगळी ओळख तयार झाली आहे. खरंतर या गावात राहणारे लोक ऐकू किंवा बोलू शकत नाही. हेच कारण आहे की गावातील मुलांमध्येही ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. येथे जन्मलेली मुले सामान्यतः कर्णबधिर आणि मुकी असतात. इथे लोक एकमेकांसोबत हावभावांनी संभाषण करतात. सांगितलं जातं की, या समस्येची पहिली नोंद १९०१ साली झाली. कालांतराने ही समस्या केवळ वाढतच गेली आहे.
Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
तज्ञांचे मत काय?
तज्ञांनुसार, गावातील लोकांमध्ये आढळणाऱ्या अनुवांशिक कारणांमुळे त्यांना या समस्येचा त्रास पिढ्यानपिढ्या सतावत आहे. याचे मूळ कारण एकाच समाजात किंवा नातेवाईकांमध्येच मोठ्या प्रमाणात होणारे विवाह आहे. आई-वडिलांचे जनुके (Genes) खूप समान असल्याने मुलांमध्ये दुर्मिळ आनुवंशिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच या गावात बहुतांश लोक मुके आणि कर्णबधिर आहेत. दुसरीकडे, गावातील काही लोक याला एक शाप मानतात.