
शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या
जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. भात, डाळ, चपाती, भाजी हे पदार्थ जेवणाच्या ताटात कायमच असतात. पण बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेला भात चांगला टिकून राहण्यासाठी काही लोक भात फ्रिजमध्ये ठेवतात तर काही पण ताटात पाणी ठेवून त्यावर भाताचा टोप ठेवून देतात. पण शिल्लक राहिलेल्या भातापासून नेमकं काय करावं? हा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या आंबोळ्या चवीला अतिशय सुंदर लागतात. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे शिल्लक राहिलेला भात फेकून देण्याऐवजी भातापासून असे नवनवीन पदार्थ बनवून खावेत. यामुळे अन्नपदार्थ वाया जाणार नाहीत. कोकणातील प्रत्येक घरात आंबोळ्या हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. आंबोळ्यांसोबत काळ्या वाटण्याची उसळ किंवा खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा नाश्त्यातील पदार्थ सगळेच खूप आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी