
उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि जीव मृत्यूच्या पिंजऱ्यात अडकणार... जाणून घ्या किती धोकादायक आहे नोरो व्हायरस
या इन्फेक्शनमुळे शरीरात अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागतो. हा व्हायरल खास करुन खचाखच भरलेल्या गर्दीमधून आणि बंद जागांमधून अधिक जलद पसरत जातो. यामुळेच हाॅस्पिटल, शाळा, क्रुज शिपसारख्या ठिकाणी याच्या अधिक घटना दिसून येतात. अलिकडेच यासंबंधित एक घटना समोर आली आहे ज्यात कॅरेबियन प्रिंसेस क्रूज शिपवर हा व्हायरल आढळून आला. मुख्य म्हणजे यामुळे तब्बल १०० हून अधिक यात्रेकरु आणि क्रू मेंबर्स आजारी पडले. अमेरिकेच्या आरोग्य संस्था CDC नुसार, जहाजावर उपस्थित असलेल्या हजारो प्रवाशांपैकी मोठ्या संख्येने लोकांनी उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची समस्या जाणवून आल्याची तक्रार केली.
किती धोकादायक आहे नोरो व्हायरल?
अमेरिकेची आरोग्य संस्था ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’नुसार, नोरो व्हायर, जगातील तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या (पोट आणि आतड्यांचा संसर्ग) प्रमुख कारणांपैकी एक आहे. दरवर्षी करोडो लोक या आजाराने ग्रस्त असतात. यात उलट्या आणि जुलाबाची प्रमुख भूमिका असल्याचे मानले जाते. अधिकतर रुग्ण हे काही दिवसांतच ठिक होतात मात्र लहान मुले आणि वृद्धांची इम्यूनिटी सिस्टिम कमजोर असल्याने हा इन्फेक्शन त्याच्यांसाठी धोकादायक सिद्ध होतो.
किती वेळीत शरीरात दिसून येतात लक्षणे?
माहितीनुसार, इन्फेक्शन झाल्याच्या १२ ते ४८ तासांमध्ये याची लक्षणे आपल्या शरीरात दिसून येतात. यातील सर्वात मोठा धोका म्हणजे डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात असलेली पाण्याची कमतरता. सतत उलट्या आणि जुलाब होत असल्याने शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ लागतो. यामुळे तोंड येणे,अचानक चक्कर येणे, अशक्तपणा आणि लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये रडताना डोळ्यांतून कमी पाणी येणे आणि जास्त झोप येणे ही देखील लक्षणे प्रमुख ठरु शकतात.
नोरा व्हायरसपासून बचाव कसा करु शकतो?
नोरा व्हायरस शरीरात फार वेगाने पसरतो ज्यामुळे इन्फेक्ट व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार लगेच पसरायला सुरुवात करतो. याशिवाय दूषित जेवण, घाण पाणी आणि इन्फेक्टेड जागांनी हात लावल्यानेही हा व्हायरस पसरु शकतो. CDC च्या अनुसार, इन्फेक्टेड व्यक्ती दोन आठवड्यांनंतर ठीक झाल्यानंतरही या आजाराचा धोका फारसा कमी होत नाही. सध्या तरी या आजारावर जालीम उपाय शोधण्यात आलेले नाही. डाॅक्टर रुग्णांना द्रवपदार्थ खाण्याचा, आराम करण्याचा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला देतात. या संसर्गावर अँटीबायोटिक्स औषधेही कामाची ठरत नाहीत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.