
Organ Donation After Death at Home: घरी मृत्यू झाल्यानंतरही अवयवदान शक्य?
Organ Donation After Death: अवयवदानाबाबत अजूनही काही लोकांमध्ये संभ्रम आहे. अजूनही काही लोक अवयवदान करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र आपल्या मृत्यूनंतर कोणत्यातरी व्यक्तीला त्या अवयवाचा उपयोग होऊन त्याचे पुढील आयुष्य चांगले जाणार असेल. तर अवयवदान करावे.परंतू एक प्रश्न नेहमीच असतो की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयाऐवजी घरी झाला, तर त्या व्यक्तीचे अवयव दान गेले जाऊ शकतात का? याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आम्ही सांगणार आहोत.
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झाला तर त्याचा अवयवाचे प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाही. मात्र त्या व्यक्तींचा मृत्यू कोणत्या परिस्थितीमध्ये झाला, मृत्यू होऊन किती वेळ झाला तसेच त्या व्यक्तीच्या तपासणीत निष्पन्न केले जाते की, पुढची प्रक्रिया काय आहे.
रुग्णालयात एखाद्या व्यक्तीला मेंदूमृत घोषित केले जाते, तेव्हा काही महत्त्वाचे अवयव दुसऱ्या रुग्णासाठी उपयोगी ठरू शकतात. अशा वेळी हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि लहान आतडे यांसारख्या अवयवांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र ही प्रक्रिया रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेच्या देखरेखीखालीच केली जाते. अवयव शरीरातून काढण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय स्थिती तपासली जाते आणि योग्य रुग्ण मिळाल्यानंतर ठरावीक वेळेत प्रत्यारोपण केले जाते. Organ Donation After Death at Home:
याउलट, घरी झालेला नैसर्गिक मृत्यू वेगळ्या प्रकारचा असतो. हृदयाचे ठोके आणि शरीरातील रक्ताभिसरण थांबल्यानंतर अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे काही काळानंतर त्यांचा प्रत्यारोपणासाठी वापर करणे शक्य राहत नाही. अशावेळी त्या व्यक्तीचा कॉर्निया म्हणजेच डोळ्याचा पारदर्शक पुढचा भाग. योग्य परिस्थितीत मृत व्यक्तीचा कॉर्निया गरजू व्यक्तीसाठी उपयोगी पडू शकतो.
फक्त कॉर्नियाच नाही, तर काही परिस्थितीत त्वचा, हाडे, टेंडन आणि हृदयाच्या झडपांसारख्या ऊतींचाही उपयोग होऊ शकतो. मात्र प्रत्येक मृत व्यक्तीचे हे दान स्वीकारले जाईलच असे नाही. त्यासाठी वैद्यकीय तपासणी, मृत्यूची परिस्थिती आणि संबंधित ऊती बँकेचे नियम महत्त्वाचे असतात.
एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना अवयव किंवा नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत रुग्णालय, नेत्रपेढी किंवा संबंधित संस्थेशी संपर्क साधावा. अवयवदानात वेळेला खूप महत्त्व असते. त्यामुळे अंत्यविधीची तयारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे योग्य ठरते. डॉक्टर परिस्थिती पाहून काय दान होऊ शकते आणि पुढे कोणती प्रक्रिया करायची, हे स्पष्ट सांगतात.