
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर
वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, सतत तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. दिवसभर धूळ, माती आणि प्रदूषणाच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ, माती आणि अतिरिक्त तेल जमा होते. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येणे, मुरूम येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज होते. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा चेहऱ्यावर गंभीर परिणाम दिसू लागतो. चुकीच्या क्रीम वापरल्यामुळे त्वचा उजळदार दिसण्याऐवजी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)
सुरकुत्या, चेहऱ्यावर आलेल्या बारीक रेषा त्वचा वयस्कर करून टाकतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या क्रीमचा वापर करू नये. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी गुलाब पाणी आणि तुरटीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीच्या वापरामुळे त्वचेच्या असंख्य समस्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि ग्लोइंग करण्यासाठी इतर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
गुलाब पाणी आणि तुरटीचा एकत्र वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज घ्या. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल. १० मिनिट झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुरटीच्या वापरामुळे त्वचा कोरडी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ केल्यानंतर फेस क्रीम लावणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा तुरटीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा कमी करण्यासाठी तुरटी प्रभावी ठरते. गुलाब पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट करते. तेलकट त्वचा असलेल्या महिलांसाठी तुरटीचा फेसपॅक खूप जास्त प्रभावी ठरते. हा फेस पॅक आठवड्यातून एकदाच चेहऱ्यावर लावावा.