
आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा 'हे' पदार्थ
बद्धकोष्ठता होण्याची कारणे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता आणि अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीराला खूप जास्त हानी पोहचते. वारंवार पोटात गॅस होणे, ऍसिडिटी, मळमळ, उलट्या, आंबट ढेकर इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट साफ न होणे, शौचास जोर लावावा लागणे, पोटात दुखणे आणि दिवसभर पोटात जडपणा वाटणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. कारण वातावरणातील गारव्यामुळे कमीत कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)
काहींना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय शरीरासाठी अतिशय घातक ठरते. लगेच झोपल्यामुळे शरीरात अन्न पचन होण्याऐवजी तसेच साचून राहते. अन्नाचे कण साचून राहिल्यामुळे पोटात वेदना होणे, अपचन आणि आंबट ढेकर येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांची हालचाल कायमच सुलभ राहील. थंडीच्या दिवसांमध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. कोमट पाण्याच्ये सेवनामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि पोट मोकळे होऊन शरीरातील घाण बाहेर पडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर युक्त पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. ओट्स, मुगाची खिचडी, गाजर, बीट, सफरचंद, पपई, केळी, हिरव्या भाज्या आणि सूप इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील. रात्रीच्या जेवणात मसालेदार, तेलकट आणि पचनास जड असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आलं–जिरे–ओवा इत्यादी पदार्थांपासून बनवलेला काढा प्यावा. एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाण्यात जिरं, ओवा आणि किसलेले आलं घालून पाणी उकळवून घ्या. १५ मिनिटं मंद आचेवर काढा शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेला काढा गाळून सेवन करावे. उपाशी पोटी काढा प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. कोमट पाण्यातून जिरं आणि ओव्याचे सेवन केल्यास आतड्यांची हालचाल सुलभ राहील आणि शरीर डिटॉक्स होईल.
थंडीत शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर १०–१५ मिनिटे चालणे, हलका स्ट्रेचिंग, पोटाभोवती मसाज करावा. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच वाढलेले वजन कमी होते. बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि शौचास जोर लावण्याच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे, शौचास कमी वेळा होणे किंवा शौच करताना जोर द्यावा लागणे
Ans: अधिक फायबर असलेले पदार्थ खा.दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
Ans: फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी असणे.