(फोटो सौजन्य: Pinterest)
पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला
परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? जेवण हे केळ्याच्या पानावरच का सर्व्ह केले जाते? तुम्हालाही जर वाटत असेल की केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करणे म्हणजे फक्त दक्षिण भारताची परंपरा आहे तर आज यामागचे मूळ कारण तुम्ही जाणून घेणार आहात. केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करणे ही जरी एक पारंपारिक पद्धत असली तरी याची सुरुवात एका वैज्ञानिक कारणामुळे झाली होती.
केळ्याच्या पानावर जेवण सर्व्ह करण्यामागचे कारण?
दक्षिण भारतात उष्ण आणि दमट वातावरणात केळ्याची झाडे सहज उगवतात. जुन्या काळात केळ्याची पाने फार सहज उपलब्ध असायची, ज्यामुळे सामूहिक भोजनावेळी त्यांचा ताटाच्या रुपात वापर केला जाऊ लागला. केळ्याचा पानांचा हा वापर स्वाभाविक आणि सुविधाजनक होता.
केळ्याच्या पानांचा वापर केल्यानंतर त्यांना फेकले जाते ज्यानंतर जनावर त्यांचे सेवन करतात यामुळे कचरा तयार होत नाही. यामुळे शेकडो लोकांना जेवण सर्व्ह करताना शेकडो भांडी घासायची गरज पडत नाही आणि केळ्यांच्या पानांचा वापर सोयीस्कर ठरतो. केळीच्या पानाचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि मेणचट असतो, ज्यामुळे त्यावर भात, सांबार, भाज्या, लोणची आणि इतर पदार्थ वाढणे सोपे जाते. गरम पदार्थ त्यावर ठेवल्यावर पानातून एक मंद नैसर्गिक सुगंधही बाहेर पडतो, ज्यामुळे जेवणाचा अनुभव अधिक आनंददायी होतो.
जेवनाचा क्रम
केळ्याच्या पानांचा वापर फक्त सुविधेच्या कारणामुळे केला जात नाही तर पारंपरिक दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत अन्न एका विशिष्ट क्रमाने वाढण्याची परंपरा देखील आहे. म्हणजेच केळ्याच्या पानावर प्रत्येक पदार्थ हा एका विशेष क्रमाने वाढला जातो. सांबार, रसम आणि शेवटी दही किंवा पायसम यांसारखे पदार्थ भातासोबत वाढले जातात. तर चटणी, पापड, वडा असे पदार्थ पानाच्या एका साईडला वाढले जातात. यामुळे केळ्याचे पान हे फक्त जेवणासाठीचे ताट बनत नाही तर भोजन व्यावस्थेचा एक भागही बनते.
आरोग्यासाठी फायदेशीर
दक्षिण भारतात जुन्या काळापासून आयुर्वेदाचे पालन केले जात आहे. अशात केळ्याच्या पानात जेवण केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळाल्याचा दावाही केला जातो. केळ्याच्या पानांमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर मान्यता आहे की, केळ्याच्या पानावर जेवण केल्याने याचा पचनालाही फायदा होतो. गरम जेवण जेव्हा केळ्याच्या पानावर सर्व्ह केले जाते तेव्हा यातील पोषक घटक आपोआप जेवणासोबत मिसळले जातात आणि आपल्या शरीराला फायदा मिळवून देतात.






