मुंबई : सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं राज्यातील काही भाग सोडता सर्वंत्र थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत, दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळं मुंबईतील वातावरण बिघडले असून, दिल्ली पाठोपाठ मुंबईत हवेतील गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळं त्याच्या परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
[read_also content=”सन्माननीय औरंगजेबजी! छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबवरुन सामनातून भाजपावर टिका, ‘या नेत्यामुळं’ राज्यातील वातावरण गढूळ? वाचा… https://www.navarashtra.com/maharashtra/honorable-aurangzebji-chhatrapati-sambhaji-maharaj-and-aurangzeb-criticized-the-bjp-the-atmosphere-in-the-state-is-becoming-cloudy-because-of-this-leader-360071.html”]
मुंबईत किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती. दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळं हवेतील गुणवत्तेत घट झाला आहे. यामुळं आरोग्यास घातक असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, मागील दोन तीन दिवसात मुंबईत माझगाव, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथील हवेची गुणवत्ता दिवसभर ‘अतिवाईट’ नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हवा वाईट ते अती वाईट या श्रेणीत असेल.
पुढील काळात मुंबईमध्ये थंडीची तीव्रता काही काळ वाढणार असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावरही होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे, त्यामुळं काळजी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. तसेच हवेची घसरलेली गुणवत्ता आता पुन्हा किती काळ मुंबईकरांना अनुभवावी लागणार, यामुळं मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.