
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनादरम्यान होळी आणि गुढीपाडवा यासारख्या सुट्ट्या येत आहेत, त्यामुळे दोन्ही सभागृहे शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काम करत राहतील.
Rohit Pawar PC: ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान १ ते ३ मार्चपर्यंत होळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर, सभागृह सलग चार दिवस बंद राहील. १९ मार्च (गुढी पाडवा), २० (शुक्रवार), २१ (शनिवार) आणि २२ (रविवार). अधिवेशन तीन दिवसांनी, २५ मार्च रोजी तहकूब केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बैठकीला उपस्थित होते.
दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुंबईतील सचिवालयातील त्यांच्या कार्यालयात आपले स्थान स्वीकारून आपले नवे कर्तव्य स्वीकारले.
Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते
बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम दिवंगत अजित पवार यांनीच केला होता. २०११ साली अजित पवार यांच्याकडे पहिल्यांदाच अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी आली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर जून २०१४ रोजी त्यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पाची मांडणी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मार्च २०२०, २०२१ आणि २०२२ मध्येही त्यांनी अर्थसंकल्प मांडला. (Maharashtra Assembly Budget Session 2026)
महाविकास आघाडीतून अजित पवार बाहेर पडले आणि त्यांनी महायुती सरकारमध्ये प्रवेश केला.त्यानंतर २०२४ मध्ये अंतरिम, तर जून २०२४ मध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुतीसोबत लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.
१० मार्च २०२५ रोजी अजित पवार यांनी ११ व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यासह त्यांनी त्यांचे माजी सहकारी जयंत पाटील (१० वेळा अर्थसंकल्प) यांचा विक्रम मोडीत काढला होता. राज्यातील तत्कालीन सरकारचा कार्यकाळ पाहता, अजित पवार हे बॅ. शेषराव वानखेडे यांचा १३ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा ऐतिहासिक विक्रम सहज मोडतील, अशी सर्वांना खात्री होती. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे हा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी हुकली.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार होता. स्थानिक निवडणुकांच्या धावपळीत असूनही अजित पवार वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते. महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांची विशेष बैठकही घेतली होती. अर्थमंत्री म्हणून पूर्ण तयारी झालेली असतानाच, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच त्यांचे अकाली निधन झाले. यामुळे वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात मोठी शोककळा पसरली आहे.
सध्या अर्थ आणि नियोजन ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मागण्यांचा ताळमेळ बसवून सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान फडणवीसांसमोर असेल. अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी अजित पवार यांनी पूर्ण केली होती. त्यामुळे या अर्थसंकल्पात त्यांनी आखलेली धोरणे आणि प्रकल्पांची झलक पाहायला मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “अर्थसंकल्पावर दादांनी मोठे काम केले आहे, पुढचे उर्वरित काम मी पूर्ण करेन.” असं म्हटलं आहे.