
अकोला ठरले जगातील दुसरे उष्ण शहर; तापमानाचा पारा 44 पार
अकोला : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याचा भयाण त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात तर सूर्य चांगलाच कोपला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक अकोल्यामध्ये तापमानची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अकोला तापले होते. विशेष म्हणजे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.
अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे ‘उष्ण’ शहर म्हणून नोंद करण्यात आली. विदर्भातील उन्हाळा तापू लागला आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईत आर्द्रता वाढली
मुंबईतील कमाल तापमान कमी असले तरीही आर्द्रतेचे प्रमाण जवळपास ८६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा मुंबईकरांना सहन कराव्या लागत आहेत. मुंबईत महानगरातील डहाणूमध्ये ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी हवामान खात्याने केली आहे. तर अलिबागमध्ये ३५.७ अंश तापमान राहिले. सोमवारी उन्हाचा सर्वाधिक तडाखा अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना बसला. अकोल्याच्या कमाल तापमान मोसमातील उच्चांकी ४३.८ वर पोहोचला.
किनारपट्टी भागात तापमान कमी, तरीही उकाडा
किनारपट्टी भागात तुलनेने तापमान कमी राहिले असून, मुंबई येथे ३६, डहाणू येथे ३५.८, रत्नागिरी येथे ३४.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मात्र, तरीही उकाडा जाणवला. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अभाव असून, कोरडे व उष्ण वातावरण कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची आहे.
Mumbai Weather : पुन्हा उष्णतेचा कहर! अनेक ठिकाणी पारा 40 अंशांपलीकडे, हवामान विभागाचा इशारा