(फोटो सौजन्य-Gemini)
जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी २.३४ लाख शेतकरी तसेच नागरिकांना ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. कर्जमाफीच्या चर्चेमुळे काही शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली नाही. त्याशिवाय अतिवृष्टीमुळेही शेतकरी अडचणीत आले आणि बँकांचे थकबाकीदार राहिले. त्यामुळे त्यांना सावकारांच्या घरांच्या चकरा माराव्या लागल्या. या दरम्यान अनेक सावकारांकडून कर्जवाटप करण्यात आले. जिल्ह्यात सध्या सावकारीचे परवाने घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
गल्लोगल्ली अवैध सावकारांनी दुकाने उघडली आहेत. या सावकारांकडून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची बाब समोर येत आहे. नागरिकांकडून तक्रार झाल्यावरच कारवाई होत असल्याने सावकार मनमानी पद्धतीने व्याजासह पैसे वसूल करीत आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई अमरावती जिल्ह्यात होत असल्याने अवैध सावकारी उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. तसेच अनेक परवानाधारक सावकारांकडूनही अवैध सावकारी होत असल्याची बाब समोर आली. अनेक परवानाधारक सावकारांकडील बहुतांश कर्जवाटप कागदपत्रांवरच राहिले असताना सहाय्यक निबंधकांकडून कारवाई करण्यात आली नाही.
जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकार असून त्यापैकी सर्वाधिक २५० अमरावती आणि १५३ अचलपूर तालुक्यात आहेत, तर सर्वात कमी ९ भातकुली तालुक्यात आहेत. मोर्शीमध्ये ३३, अंजनगाव सुर्जी २३, धामणगाव रेल्वे ३३, वरूड ४४, अचलपूर १५३, धारणी २१, नांदगाव खंडेश्वर १४, चांदूर रेल्वे ११, चांदूर बाजार ४३, तिवसा १९ आणि दर्यापूर तालुक्यात १४ परवानाधारक सावकार आहेत.
शेतकऱ्यांसाठी ०९ टक्के प्रतिवर्ष गहाण कर्ज
१२ टक्के प्रतिवर्ष बिनागहाण कर्ज
बिनाकृषी कर्जाचे कर्जदार ११७०७२ पैसे १७४४५.७५
गहाण कर्जाचे कर्जदार ११२६७४ पैसे १६,८५६.६५
बिनागहाण कर्जाचे कर्जदार ४३९८ पैसे ५८९.१०
एकूण कर्जाचे कर्जदार २३४१४४ पैसे ३४८.९१






