Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Farmers : ‘जरांगेंकडे जायला वेळ, शेतकऱ्याच्या बांधावर यायला नाही’; बीडच्या शेतकऱ्यांचा सरकारवर घणाघात

बीडमध्ये पावसाअभावी पिकं वाळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘जरांगेंकडे जायला वेळ, शेतकऱ्याच्या बांधावर यायला नाही’ म्हणत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 12, 2026 | 08:25 PM
Beed drought crop damage

Beed drought crop damage

Follow Us
Follow Us:
  • ‘जरांगेंकडे जायला वेळ, शेतकऱ्याच्या बांधावर यायला नाही’; बीडच्या शेतकऱ्यांचा संताप
  • पावसाअभावी सोयाबीन वाळलं; दोन-अडीच लाखांचा खर्च पाण्यात गेल्याची शेतकऱ्याची व्यथा
  • मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी
 

Beed Farmers : पावसाळा सुरू होऊन तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिकं वाळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठं संकट उभं राहिलं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यादेखत करपताना पाहून शेतकऱ्यांचा संयम आता सुटू लागला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बीडमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. ‘शेतकरी मेला काय आणि जगला काय, सरकारला काहीच देणं-घेणं नाही,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘जरांगेंकडे जायला वेळ, शेतकऱ्याच्या बांधावर यायला नाही’

शेतकऱ्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरच सवाल उपस्थित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे जाण्यासाठी सरकारकडे वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली. ‘जरांगेंना आमचा विरोध नाही, पण शेतकरीही जगला पाहिजे,’ असं म्हणत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Manoj Jarange Patil : ‘जरांगे भंपक माणूस, ऑस्करसाठी नामांकन पाठवा’; अजय बारसकरांची घणाघाती टीका

‘शेतात गांजाचं झाड सापडलं असतं तर प्रशासन धावून आलं असतं’

नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप मंत्री, आमदार, खासदार किंवा शासनाचा प्रतिनिधी शेतावर आला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ‘शेतात गांजाचं एक झाड सापडलं असतं तर सगळं प्रशासन धावत आलं असतं,’ असा टोला लगावत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पावसाअभावी गुरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून हाताला कामही नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

दोन-अडीच लाखांचा खर्च, सोयाबीन हाताने उपटलं

गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सहा एकरमधील सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाळून गेलं. मजूर लावण्याचा खर्च परवडत नसल्याने बाप-लेकाने स्वतःच्या हाताने पीक उपटून टाकल्याची हतबल करणारी परिस्थिती समोर आली आहे. या पिकासाठी दोन ते अडीच लाख रुपये व्याजाने काढून खर्च केल्याचं संबंधित शेतकऱ्याने सांगितलं.

दरम्यान, सरकार आणि विरोधकांवरही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सरकार या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मदतीची घोषणा कधी करणार आणि कोरडा दुष्काळ जाहीर करणार का, याकडे बीडमधील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Maratha Reservation : जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘सरकार चर्चेसाठी तयार’

Web Title: Beed farmers drought maharashtra government marathwada rainfall crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Beed News
  • drought news
  • Farmers News

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
2

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
3

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
4

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.