
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर
मोहाडी तालुक्यातील शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक मोठ्या प्रमाणावर शासकीय कामांमध्ये व्यस्त असल्याने शाळांमधील त्यांची उपस्थिती कमी झाली आहे. एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शंका निरसन आणि अभ्यासाची पुनरावृत्ती आवश्यक असते. मात्र, घरभेटी व माहिती संकलनाच्या कामांमुळे या गोष्टींवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ४२ हजार ३९९ लोकसंख्येच्या जनगणनेसाठी ३५ पर्यवेक्षक आणि १९५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. याशिवाय १४७ शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शालेय जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय कामांचा दुहेरी ताण शिक्षकांवर पडत असून, कामात त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशाराही दिला जात असल्याने शिक्षकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे.
परीक्षांच्या काळात पटपडताळणी प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून तीव्र विरोध होत आहे. या प्रक्रियेमुळे परीक्षा नियोजनात अडथळे निर्माण होत असून विद्याथ्यांच्या अभ्यासावर आणि निकालावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पटपडताळणी आणि परीक्षा या स्वतंत्र प्रक्रिया असून त्या एकाच वेळी राबवणे अव्यवहार्य असल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.
अंदाज समितीकडून मनपाची झाडाझडती; प्रशासकीय कारभारातील गंभीर त्रुटी उघडकीस
परीक्षा काळात पटपडताळणी प्रक्रिया राबवणे हे पूर्णतः अयोग्य असून यामुळे शिक्षकांवर कमालीचा ताण वाढत आहे. शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही मोहीम तातडीने थांबवून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.- राजू बालपांडे, अध्यक्ष, भभंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघ
भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेने या पटपडताळणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. परीक्षा काळात अशा मोहिमा राबवणे विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे नसून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.