Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parinay Fuke: “पॅराशूट नेता म्हणून…”; आमदार फुकेंची हर्षवर्धन सपकाळांवर सणसणीत टीका

देशात लवकरच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. यामुळे कोणाची संख्या किती आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी घाई न करता शांत रहावे, असे फुके म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 03:26 PM
Parinay Fuke: “पॅराशूट नेता म्हणून…”; आमदार फुकेंची हर्षवर्धन सपकाळांवर सणसणीत टीका
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: आज नागपूरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील भाष्यकेले आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके म्हणाले, “ऑपरेशन ब्ल्यू वर राहुल गांधी यांनी माफी मागितली. म्हणजेच देर आये दुरुस्त आये.. असेच झाले. शिख बांधवांच्या हत्या करून त्यांना बेघर करण्यात आले होते. हे पाप काँग्रेसने केले. राहुल गांधी यांनी याबद्दल माफी मागितली. ही माफी आधीच मागितली असती तर बरे झाले असते.”

पुढे बोलताना परिणय फुके म्हणाले, “सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत असल्यासारखे चित्र आहे. पक्षातील कार्यकर्ते काम करण्यास तयार नसल्याने ते पडत्या काळात माफी मागत आहेत. आता माफी मागणे म्हणजे राहुल गांधी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने मलीन झालेली आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.”

“देशात लवकरच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. यामुळे कोणाची संख्या किती आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी घाई न करता शांत रहावे. जातीनिहाय जनगणना झाल्यावर मराठा समाज ३२ टक्के आहे की किती टक्के आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतरच आरक्षण असो व किंवा कोणत्या सोयी सुविधा द्यायच्या, कोणत्या योजना आणल्या पाहिजेत हे स्पष्ट होईल”, असे भाजप आमदार परिणय फुके म्हणाले.

यावेळेस बोलताना फुके यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातील लोकं त्यांना स्वीकारत नसल्याने “पॅराशूट” नेता म्हणून ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना लादले गेल्याने काही वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

परभणीतून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर जोरदार टीका

हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर जोरदार टीका

भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Bjp mla parinay fuke criticizes to congress maharashtra president harshwardhan sapkal maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • BJP
  • Harshwardhan Sapkal
  • Manoj Jarange
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.