मुंबई : सध्या राज्यात व मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्राला भाजपाने देखील उत्तर दिलं आहे.
[read_also content=”उद्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान, मुंबईत काँग्रेसचे २३६ प्रदेश प्रतिनिधी करणार मतदान https://www.navarashtra.com/maharashtra/tomorrow-congress-presiedent-election-mumbai-many-leaders-voting-336711.html”]
दरम्यान, या पत्रात राज यांनी म्हटलं की, प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, स्वर्गीय रमेश लटके यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश ह्यांच्या आत्म्यास खरी शांती मिळेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना लिहिलं आहे. या पत्रानंतर भाजपाने राज ठाकरेंच्या पत्राला उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड (Prasad lad) म्हणाले आम्ही राज ठाकरे यांनी पत्र लिहून सांगितलेल्या मताच आदर करतो. मात्र हे त्यांचं वैयक्तिक किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. पण भाजपाने कोणता निर्णय ध्यावा, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस आणि अशिष शेलार यांच्याकडे आहे. या पोटनिवडणुकीबाबत पक्षाने कोणता निर्णय घ्यावा, हे पक्षाचं नेतृत्व निश्चित करेल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. पण फडणवीस या पत्रावर काय बोलतात किंवा काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.