• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Central Government Abolishes Export Duty On Onions Nras

Onion farmer: केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द; शेतकऱ्यांना होणार असा फायदा

गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर नकारात्मक परिणाम होत होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 23, 2025 | 02:23 PM
Onion farmer: केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द; शेतकऱ्यांना होणार असा फायदा

Photo Credit- Social Media केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश आले आहे.  केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.येत्या १ एप्रिल 2025 पासू या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल.  या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरामध्ये स्थिरता राखण्यासाठी 20% निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या धोरणामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकरी संघटनांनी वारंवार आंदोलन करून सरकारकडे शुल्क हटवण्याची मागणी केली होती.

अखेर, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने निर्यात शुल्क हटवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता बाजारभावाकडे लागले आहे. विशेषतः लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याला मिळणाऱ्या दरावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे, कारण हा बाजार देशातील कांदा दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

अर्धवट जळालेल्या नोटा काढताना अग्निशमन दलाची दमछाक…; न्या. यशवंत वर्मा यांच्या घरातील Video Viral

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. या निर्णयामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर नकारात्मक परिणाम होत होता, परिणामी शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फटका बसत होता. निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होत होती. उत्पादन खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताणही वाढला होता. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.

Justice Yashwant Verma: न्या. यशवंत वर्मांवर पुढे काय कारवाई होणार; अशी आहे सर्वोच्च न्यायालयाची प्रक्रिया?

केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (22 मार्च) कांद्यावरील २०% निर्यात शुल्क हटवण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. सरकारने देशांतर्गत कांद्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि बाजारातील स्थिरता राखण्यासाठी यापूर्वी निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य लागू केले होते. ८ डिसेंबर २०२३ ते ३ मे २०२४ या कालावधीत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी घातली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंदी आणि किमान निर्यात मूल्याचे निर्बंध मागे घेण्यात आले. १३ सप्टेंबर २०२४ पासून २०% निर्यात शुल्क लागू करण्यात आले, ज्याचा कांद्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण १७.१७ लाख टन कांदा निर्यात झाला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १८ मार्चअखेर ही निर्यात घटून ११.६५ लाख टनांवर आली. १ एप्रिल २०२५ पासून निर्यात शुल्क हटवल्याने कांद्याच्या निर्यातीला पुन्हा चालना मिळेल, शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचे संतुलन राखले जाईल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून, त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: Central government abolishes export duty on onions nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • onion farmers

संबंधित बातम्या

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड ‘एनसीसीएफ’कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर
1

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड ‘एनसीसीएफ’कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर

onion Farmers : नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री सुरू; शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
2

onion Farmers : नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री सुरू; शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

मोठी बातमी ! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले; शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
3

मोठी बातमी ! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले; शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.