
Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अॅक्शन प्लॅन तयार
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार
या आराखड्याची खास बाब म्हणजे, तो केवळ तातडीच्या उपायांपुरता मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ३ टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५, दुसरा टप्पा १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६, तर तिसरा टप्पा १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या तिन्ही टप्प्यांसाठी एकत्रितपणे १६.५५ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये विहिरींची दुरुस्ती व खोलीकरण, गाळ काढणे, झिरे वा बुडकी घेणे, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन विंधन विहिरी व कूपनलिका उभारणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, हातपंपांची देखभाल, तसेच टँकर व बैलगाडीमार्फत पाणीपुरवठ्याचा समावेश आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात परिणामकारक उपाययोजनांचा समावेश करून निधीची मागणी करण्यात आली आहे. ५३९ गावांना टंचाईची झळ बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून मंजुरी मिळताच कामांना वेग देण्यात येईल. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल. – सुमित बेलपत्रे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
गत काही वर्षांत जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. भूजल पातळी घटणे, वाढती लोकसंख्या, शेतीसाठी वाढलेला पाण्याचा वापर आणि अपुऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरी व नळयोजना कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा अधिक प्रभावी आणि व्यापक नियोजन केले आहे.