
पिंपरी-चिंचवड, PCMC News,पाणीटंचाई, Water Crisis, Pimpri Chinchwad, Pune News, Breaking News
एकेकाळी पवना नदीच्या काठावर वसलेल्या चार ग्रामपंचायतींचे रूपांतर आज एका महाकाय महानगरात झाले आहे. मात्र, शहराचा विस्तार ज्या वेगाने झाला, त्या वेगाने पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. धक्कादायक वास्तव हे आहे की, शहरात पाणी नाही असे नाही, तर उपलब्ध पाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन ‘राजकीय’ आणि ‘तांत्रिक’ चक्रव्यूहात अडकले आहे.
Pune News: पुण्यात माणुसकीला काळीमा! कर्जदार दांपत्याला बँक एजंटकडून लाथाबुक्क्यां
शहराची तहान भागवण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच आहे
पिंपरी-चिंचवडच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख ‘मावळ गोळीबाराच्या’ त्या काळ्या दिवसाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. २०११ मध्ये थेट जलवाहिनी आणण्याच्या प्रयत्नात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आणि प्रकल्पाला स्थगिती मिळाली.
तब्बल १२ वर्षांनंतर २०२३ मध्ये ही स्थगिती उठवण्यात आली असली, तरी राजकारणाचे धुमारे आजही या प्रकल्पावर साचले आहेत.
विशेष म्हणजे, मावळचे नेते या प्रकल्पाला विरोध करतात, तर पिंपरीचे नेते समर्थनाची भूमिका घेतात. पक्षांची ही दुटप्पी भूमिका शहराला तहानेने व्याकुळ करत आहे. श्रीमंत महापालिका असूनही निधीसाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसावे लागणे, हे शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी दुर्दैवी आहे.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ नावाचीही जोरदा
66 श्पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय संवेदनशील आहे. आम्ही बाधितांशी चर्चा -करून मार्ग काढू, भामा आसखेडच्या कामासाठी नवीन निविदा काढल्या आहेत. हे काम पूर्ण होताच शहरवासीयांना दररोज पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे.१
रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड
भामा आसखेड योजना २०१४ मध्ये सुरू झालेले काम २०२४ उजाडले तरी अपूर्णच आहे. ठेकेदाराची हकालपट्टी आणि भूसंपादनाचे अडथळे यामुळे ३० टक्के काम आजही अधांतरी आहे.
आंद्रा प्रकल्पः कागदावर असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘समन्यायी वाटपाचे कारण देऊन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे-जोवर भामा आसखेडचे पाणी येत नाही, तोवर दररोज पाणी मिळणार नाही!