
Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण वातावरणात मार्गक्रमण करत रॅली सायंकाळी दीक्षाभूमी येथे पोहोचली. तेथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत राजेंद्र वैद्य, शिवा राव, संदीप गिरे, दिलीप चौधरी, नागवंश नगराळे, रामू तिवारी, नरेंद्र बोबडे, संतोष कुचनकर यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समारोपस्थळी मनपा स्थायी समितीचे सभापती मनस्वी गिरे, पार्षद राजेश अडूर, ॲड. राहुल घोटेकर, सचिन कल्याळ, प्रवीण पडवेकर, दीपक जेजूरकर, बृजप्रकाश थमके, अनु दहेगांवकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ खा. प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई अमानुष असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
लाठीचार्जात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, तसेच आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून धमकावणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.