
Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात २९६ नैसर्गिक जलस्रोत आहेत. या नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पावसाळ्यानंतर साठलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहते आणि ते आटत नाही, तोपर्यंत वन्यप्राण्यांना नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होत राहते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक जलस्रोत आटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी बफर क्षेत्रात ३२१ कृत्रिम पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये सोलार बोरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, पाणी पुरवठ्यासाठी कोणत्याही वाहनाचा वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. याशिवाय, १४८ मानव निर्मित तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जंगलामध्ये प्रत्येक १ ते २ चौरस मीटर क्षेत्रामागे एक पाणवठा या प्रमाणात नियोजन करण्यात आले असून, वन्यजीवांना सहजपणे पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली आहे. या उपाययोजनांमुळे हरीण, नीलगाय, रानडुक्कर तसेच वाघांसारख्या प्राण्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे वन्यजीवांचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होत असून जैवविविधतेच्या संवर्धनाला देखील बळ मिळत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जलस्त्रोत कमी होत आहे. मात्र विनविभाग आणि वन्यजीव विभागाने यंदा प्राण्यांसाठी पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) विभागामध्ये अनेक कृत्रिम पानवठे वन्यजीवांसाठी तयार करण्यात आले असून यात चंद्रपूर परिक्षेञात ६०, खडसंगी येथे २१, मोहुर्ली येथे ३५, मूल येथे ३३, पळसगाव येथे १६, शिवनी येथे १५६ याप्रमाणे एकूण ३२१ पाठवठ्यांचा समावेश आहे.
व्यावसायिक सिलिंडरची चिंता आता मिटणार; गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार
विविध भागांतील मानवनिर्मित तलाव आणि नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या एका अहवालात सादर करण्यात आली आहे. मानवनिर्मित तलावांची संख्या १४६ इतकी नोंदवण्यात आली आहे. चंद्रपूर येथे ३३, खडसांगी येथे १२, मोहर्ली येथे २८, मुल येथे १५, पाचगाव येथे १७ आणि शिवनी येथे ३३ तलाव आहेत. तर नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या २९६ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूरमध्ये ७६, खडसंगीमध्ये ३१, मोहरलीमध्ये ५१, मुलमध्ये २९, पळसगावमध्ये ४४ आणि शिवनीमध्ये ६५ नैसर्गिक पाणवठे आहेत. या आकडेवारीवरून संबंधित परिसरात नैसर्गिक जलस्रोतांची संख्या मानवनिर्मित तलावांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते.