जटायू नावाच्या या मशीनद्वारे सुमारे एक टन कचरा उचलता येत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. संबंधित कंपनीने महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर या मशीनचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी महापौर समीर राजूरकर, नगरसेवक मनोज गांगवे, राजगौरव वानखेडे आदी उपस्थित होते.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
महापौर राजूरकर यांनी सांगितले की, ‘जटायू’ मशीन कोणत्याही प्रकारच्या वाहनावर बसविता येते. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज भासणार नाही. शहरातील विविध तथा ठिकाणी अनधिकृतपणे टाकला जाणारा कचरा कमी वेळेत हटविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.
दरम्यान, विभागीय आयुक्त सीएसएमआरडीएचे जी. श्रीकांत यांनी महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कचरा संकलनासाठी अशा मशीनचा वापर करता येईल का, याची चाचपणी केली होती. पुणे जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये अशा मशीनचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कंपनीशी संपर्क साधून संभाजीनगरात प्रात्यक्षिकासाठी बोलावण्यात आले.
मशीनच्या कार्यक्षमतेची पाहणी करण्यासाठी महापौरांसह नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे पाच ते दहा किलो वजनाच्या वस्तूही मशीन सहज उचलत असल्याचे प्रात्यक्षिकातून दिसून आले. कमी वेळेत कचरा हटविण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, असे नगरसेवक मनोज गांगवे यांनी सांगितले. मात्र, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सुविधा या मशीनमध्ये नसल्याने दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र उचलला जातो.
‘जटायू’ मशीनच्या प्रात्यक्षिकात आठ ते दहा मिनिटांत एक ट्रॅक्टरभर कचरा उचलता येत असल्याचे दाखविण्यात आले. मशीनची कचरा उचलण्याची क्षमता सुमारे एक टन असल्याचा कंपनीचा दावा आहे. पाच ते दहा किलो वजनाच्या वस्तूही मशीन सहज उचलू शकते. ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकत्र उचलला जाणे ही मात्र या यंत्राची प्रमुख मर्यादा आहे.






