पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान. आंबे, कलिंगड आणि उन्हाळी पिके उद्ध्वस्त. तात्काळ पंचनामे करण्याची आप्पासाहेब निर्मळ यांची मागणी.
कोरोना काळात 'लॉकडाऊन' लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे.
इराण, इजरायल-अमेरिका युद्धाचा परिमाण इंधन टंचाईवर होत आहे. आवश्यक प्रमाणात इंधन मिळत नसल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला आहे तर घरगुती गॅस मिळविण्यासाठी मोठ्या रांगा पार कराव्या लागत आहेत.
महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एकूण जिल्हा उत्पन्न 2021-22 मधील 86,100 कोटींवरून 2024-25 मध्ये 1,33,105 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच 54.6 टक्के एकूण वाढ, तर वार्षिक सरासरी वाढदर सुमारे 15 ते 16 टक्क्यांपर्यत पोहचला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांचा वापर वाढवला आहे.
शेती आणि उद्योग यांची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवातून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस संपताच तापमानात वाढ झाली आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी एप्रिलमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिमेंटकरणाचा परिणाम उकाड्यावर होत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प ३२०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नवीन नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणावरून विरोधकांवर टीका केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले.